शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

निधी नाही, तर प्रशिक्षण कशाला ?

By admin | Updated: June 11, 2016 00:11 IST

विकास निधीवरून राजकारण करणारे जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायतीला थेट विकास निधी मिळणार असल्याने नाराज आहेत.

जिल्हा परिषद : ग्रामपंचायतीच्या थेट निधीवर राजकारणअमरावती : विकास निधीवरून राजकारण करणारे जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायतीला थेट विकास निधी मिळणार असल्याने नाराज आहेत. एरवी राजकारणावरून एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या सदस्यांनी विकास निधी कसा खर्च करावा, या विषयावर यशदामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा काय? विकास निधीच नाही, तर प्रशिक्षण कशाला, असा सूर सदस्यांनी लावला आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा विकास निधी थेट ग्रामपंचायतींना दिला जाणार आहे. मात्र यशदाकडून जिल्हा परिषद सदस्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे सदस्यांनी या प्रकाराला विरोध चालविला आहे. पैसा नाही, तर प्रशिक्षणही नको, असे मत व्यक्त केले आहे. ग्रामपंचायतींना सर्वाधिकार देण्याच्या प्रयत्नामुळे सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परिणामी प्रशिक्षणात सहभाग घेऊनही काय फायदा, असा सूर सध्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये उमटत आहे. ग्रामपंचायतींना निधी देण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी हा प्रयोग अमलात आणला. याचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतीद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना जोडण्याचा होता. यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दिशानिर्देशाप्रमाणे चौदाव्या वित्त आयोगाने थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचे ठरविले आहे. आधी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना मिळणाऱ्या निधीत कपात केल्याने नाराजीचा सूर आहे. जिल्हा परिषद सदस्यांकडे जवळपास जवळपास १५ ग्रामपंचायती येतात. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतींवर सदस्यांचे नियंत्रण असणार आहे. तसेच समन्वय ठेवण्याची जबाबदारी सदस्यांकडे आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षांत नेमकी कोणती कामे करायची, याचा आराखडा तयार करण्यासाठीही मार्गदर्शन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)