शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांचा काळाबाजार केल्यास फौजदारी

By admin | Updated: June 11, 2017 00:09 IST

सर्वसामान्य शेतकऱ्यांना बनावट बियाणे दिल्यास अथवा बियाणे, खताचा काळाबाजार केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश तालुका भरारी पथकाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : सर्वसामान्य शेतकऱ्यांना बनावट बियाणे दिल्यास अथवा बियाणे, खताचा काळाबाजार केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश तालुका भरारी पथकाने दिले आहेत. यंदा कपाशीच्या पेऱ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला. विशेषत: यंदा कृषी केंद्रांची तपासणी करण्यासाठी महसूल विभागाची साथ मिळणार आहे़तालुक्यात बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने भरारी पथकाची निर्मिती करण्यात येते़ तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांच्या नेतृत्वात तीन भरारी पथके नेमण्यात आली आहेत़ दुकानात स्टॉक बोर्ड, बियाणे व खताचा साठा, शेतकऱ्यांना देण्यात येणारी बिले, तसेच गोडावूनची तपासणी करण्यात येणार आहे़ रासायनिक या खताऐवजी शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश या संयुक्त घटकातील खताचा वापर केल्यास काळाबाजार होणार नाही़ यासाठी शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे़ मागील वर्षी तालुक्यात कपाशीचा पेरा अधिक होता़ यंदा कपाशी लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे कृषीतज्ज्ञांचे मत आहे़ कपाशी १८ हजार हेक्टरवरून २९ हजार हेक्टरपर्यंत पेरा होणार आहे़ बियाणे वा खताचा काळाबाजार झाल्यास जीवनाश्यक वस्तू कायद्यान्वे कृषी केंद्र सेवा संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी दिली़ महसूल विभागाच्या वतीने तालुक्यात तहसीलदार सी़सी़ कोहरे यांच्या नेतृत्वात एक भरारी पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकात मंडल अधिकारी, तलाठी यांची नेमणूक करून एखाद्या शेतकऱ्यांची तालुका प्रशासनाला तक्रार प्राप्त होताच त्याचे निवारण त्वरित करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात येणार आहे़ यासाठी कोहरे यांनी मंडल अधिकारी व तलाठ्यांना गाव पातळीवर निर्देश दिले आहेत़फसवणूक टाळणे गरजेचेबोगस बियाण्यांची विक्री करून प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. यामुळे शेतकऱ्यांची हानी होते. हे नुकसान टाळण्याकरिता आता भरारी पथक कार्य करणार असून बियाण्यांचा काळाबाजार केल्यास थेट फौेजदारी दाखल करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक देखील टळणार आहे.