शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

सदस्यांना मुदत वाढ नसेल तर निवडणुका वेळेवरच घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

अमरावती : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. ...

अमरावती : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान सदस्य व पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार असेल तर निवडणूक पुढे ढकला प्रशासकाची नियुक्ती होणार असेल तर या निर्णयाचा काहीही उपयोग होणार नाही, अशी भावना जिल्हा परिषद सदस्य पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपणार आहे. यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणे अपेक्षित आहे. यासाठी सप्टेंबर मध्ये आरक्षण जाहीर करणे गटाची रचना निश्चित करणे या प्रशासकीय बाबींची काम सुरू होते. यावेळी २०२१ जनगणना झालेली नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने २०११ च्या जनगणनेची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाला पाठवल्याचे समजते. मात्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द ठरवले आहे. यामुळे राजकीय खलबत्ते सुरू आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षण परत मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत, असा निर्णय नुकताच सर्वपक्षीय बैठकीत झाला. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार या चर्चेने जोर धरला आहे. याचवेळी निवडणुका पुढे ढकलल्याने मार्चपासून विद्यमान सदस्यांची मुदत संपणार असून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांच्या हातात जाणार आहे. ओबीसी आरक्षण हा विषय न्यायालयाची निगडित असल्याने सरकारने ईम्पिरिकल डाटा तयार करण्याचा कालावधी व त्यानंतर न्यायालयात दाखल केल्यानंतरही किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. त्यामुळे मुदत संपल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांना विकास कामे करता येणार नाहीत. मतदारांशी संपर्क साधण्यात काही अडचणी येतील. अशा भावना सदस्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोट

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. हा निर्णय योग्य आहे. अशातच निवडणुका पुढे ढकलल्या जात असतील तर विद्यामान जि.प. सदस्यांना सहा महिने मुदतवाढ द्यावी.

- सुरेश निमकर,

शिक्षण व बांधकाम सभापती जिल्हा परिषद

कोट

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपत आहे.अशातच ओबीसी आरक्षण मिळाल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका नकोत असा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेतला आहे.हा निर्णय योग्य असून अशातच जर निवडणुका पुढे ढकलल्या जात असतील तर विद्यमान पदाधिकारी व सदस्यांना मुदतवाढ द्यावी. प्रशासक नियुक्त न करता विद्यमान पदाधिकाऱ्यांना मतदार संघात विकास कामे व मतदारांशी संपर्क ठेवण्यात मदत होईल.

- प्रकाश साबळे,

सदस्य जिल्हा परिषद