शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

आदर्श शिक्षकांचा पगार ५० हजारांवर

By admin | Updated: January 24, 2015 22:47 IST

आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करणाऱ्या शिक्षण क्षेत्रात छाप पाडणाऱ्या राज्य अथवा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना आता ५० हजारांवर वेतन मिळणार आहे. सन २००६ पासून

स्पर्धा वाढली : वेतनवाढीवरील बंदी हटविलीअमरावती : आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करणाऱ्या शिक्षण क्षेत्रात छाप पाडणाऱ्या राज्य अथवा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना आता ५० हजारांवर वेतन मिळणार आहे. सन २००६ पासून शासनाने थांबवलेल्या वेतनवाढीवरील बंदी न्यायालयाने उठवल्यामुळे आता आदर्श होण्यासाठी शिक्षकांची स्पर्धा लागण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करणाऱ्या शिक्षकांकडून जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रस्ताव मागविण्यात येतात. या प्रस्तावातून प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण स्तरावरील दोन शिक्षकांची निवड राज्य पुरस्कारासाठी केली जाते. अशा आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शासनाच्यावतीने दोन आगाऊ वेतनवाढ दिली जाते. शासनाच्यावतीने शिक्षण विभागाला १ जानेवारी २००६ पासून सहावे वेतन आयोग लागू करण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांचे बेसिक वेतन सुमारे १७ हजारांच्या जवळपास पोहचले आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना आगाऊ दोन वेतनवाढ देण्यात येत होती. त्यामुळे हे वेतन खूपच जास्त असल्याने शासनाच्यावतीने २००६ पासून ही वेतनवाढ थांबविण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान काही शिक्षकांनी या विरोधात न्यायालयात धाव घेऊन हा अन्याय असल्याचा आरोप केला. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्यावतीने ही बंदी तब्बल आठ वर्षांनंतर १२ जानेवारी रोजी उठविण्यात आली आहे. त्यामुळे आता पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढ देण्यात येणार आहेत. सध्या शिक्षकांना सुमारे ४० हजारांच्या आसपास वेतन आहे. त्यातच दोन वेतनवाढ म्हणजे किमान ११०० रुपयांची बेसिकमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे डी.ए., एरिअस मिळून अर्धा लाखाच्यावर वेतन मिळणार आहे. (प्रतिनिधी)अशी आहे प्रस्तावाची पात्रता४आदर्श पुरस्कारासाठी शिक्षक हा गुणवंत असावा, ज्याची शिक्षण सेवा अखंडपणे किमान १५ ते २० वर्ष आहे. शिक्षण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी वर्ष आहे. अध्यापन पद्धतीत वेगळेपण आहे. तसेच ज्या शिक्षकाने आपल्या कार्यकाळात शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक, राष्ट्रीय काम करुन समाजातच सामाजिक, राष्ट्रीय काम करुन समाजात आपले प्रतिबिंब उमटवले अशा शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची सुरूवात सन १९५८-५९ पासून तर राज्य शिक्षक पुरस्काराची सुरूवात १९६२-६३ पासून करण्यात आली आहे. प्रस्तावाची पडताळणी समितीकडेजिल्हा परिषदेकडून दरवर्षी पंचायत समितीच्या मार्फत प्रस्ताव आल्यावर या प्रस्तावाची तपासणी जिल्हा समितीकडून केली जाते. या समितीमध्ये शिक्षण उपसंचालक, सचिव म्हणून शिक्षणाधिकारी, एक राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांचा समावेश असतो. या ठिकाणी प्रस्तावाची तपासणी होऊन पुढे ते शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात येते. तेथून राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येते. नंतर शिक्षकांचे नाव जाहीर केले जाते.दरवर्षी पुरस्काराला मिळतो अल्प प्रतिसादजिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मात्र प्रस्ताव मागविल्यानंतर जिल्हाभरातून केवळ तीन ते चार प्रस्ताव दरवर्षी प्राप्त होत असल्याची माहिती मिळाली आहे.