शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

‘उपाशीपोटी गेलं वं मायं लेकरू!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:38 IST

शाळेला उशीर होईल म्हणून वैभव जेवण न करता लवकरच निघून गेला तो न परतण्यासाठी. ‘उपाशी पोटी गेलं वं मायं लेकरू!’ असा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा आईने फोडला. वडिलांच्याही डोळ्यांत अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. वैभव गावंडेचे पार्थिव उचलताना नातेवाइकांचा आक्रोश पाहून समाजमनही हेलावले.

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शाळेला उशीर होईल म्हणून वैभव जेवण न करता लवकरच निघून गेला तो न परतण्यासाठी. ‘उपाशी पोटी गेलं वं मायं लेकरू!’ असा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा आईने फोडला. वडिलांच्याही डोळ्यांत अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. वैभव गावंडेचे पार्थिव उचलताना नातेवाइकांचा आक्रोश पाहून समाजमनही हेलावले.आर्थिक स्थिती जेमतेम असलेल्या कुटुंबातील वैभव गावंडे याचे वडील हरिदास हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आजी, आई-वडील, एक भाऊ व दोन बहिणी असे त्याचे कुटुंबीय. लहानपणापासून लाडत वाढलेल्या वैभव हा शांत व सोज्वळ स्वभावाचा होता. कुटुंबीयांच्या प्रत्येक कामात तोच पुढाकार घेऊन हातभार लावायचा. त्यामुळे कुटुंबीयांचा तो लाडका होता. दररोज घरून जेवण करूनच वैभव शाळेत निघायचा. शुक्रवारी तयारी करीत असताना थोडा उशिरा झाला. स्कूल बस घ्यायला येईल, हॉर्न वाजवेल, या दडपणातून वैभव घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेवूनच होता. दहाचा ठोका झाला आणि जेवण न करताच तो घराबाहेर पडला. आईने दाराजवळ आली. जेवण करून जा म्हणून सांगितले. मात्र, उशीर होत असल्याने वैभवने तिचे काही एक ऐकले नाही. स्कूल व्हॅनचा हॉर्न वाजला आणि तो धावत जाऊन वाहनात बसला. हीच माय-लेकराची शेवटची भेट ठरली. वर्गमित्रांसोबत गप्पा करीत तो शाळेत पोहोचला. शाळेतील वर्ग सुरू झाले आणि त्यानंतर मित्रांसह तो पडक्या खोलीत गेला. तेथे भिंत अंगावर कोसळल्याने वैभवाचा मृत्यू झाला.वैभवच्या कुटुंबातील सदस्याला शाळेत नोकरीमृत्युमुखी पडलेला वैभवच्या मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला शाळेत नोकरी देण्याचे आश्वासन याप्रसंगी आ. बच्चू कडू यांनी दिले. मृत वैभव तसेच जखमी मुलांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत तसेच शाळा व्यवस्थापनातील दोषींनाही निलंबित करण्याचे आश्वासनदेखील आ. कडू यांनी दिले. याशिवाय जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे आ. कडू यांनी सांगितले.काळजाचा तुकडा हिरावल्याने आक्रोशवैभवच्या मृत्यूची वार्ता ऐकताच हरिदास गावंडे हे शेतातील काम सोडून शाळेकडे बेफाम धावत सुटले. घरी असलेली आई, भाऊ व बहिणीदेखील हातातील कामे सोडून शाळेत पोहोचले. वैभवचा मृतदेह पाहून एकच आक्रोश सुरू झाला. हातपाय आपटत हंबरडा फोडणाऱ्या वैभवच्या आईचा आक्रोश पाहून समाजमन हेलावून गेले होते. पत्नी, मुलांचा आक्रोश व रडणे पाहून वडिलांनाही अश्रू अनावर झाले. गावकरी व मित्रमंडळी गावंडे कुटुंबाला धीर देत होते. मात्र, त्यांना आवरणे कठीण होते.