शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

रिपाइं ऐक्य फसवे; घोडे, गाढव एकत्र बांधणे अशक्य - आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 13:44 IST

''सध्याचे सत्ताधारी हे सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार''

अमरावती : रिपाइं ऐक्याचे यापूर्वी अनेकवेळा प्रयोग करण्यात आले. परंतु, या ऐक्यावर माझा विश्वास नाही. ही शुद्ध फसवणूक आहे. कारण घोडे, गाढव हे एकाच ठिकाणी एकत्र आणणे, हे अशक्य आहे. नेत्यांना एकत्र आणण्यापेक्षा समाजाला एका जागी आणण्यावर माझा विश्वास असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते रिपब्लिकन सेनेच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी रविवारी अमरावती शहरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

आनंदराज आंबेडकर हे पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आले होते. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे भेटी घेत स्वागत केले. यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, सध्या देशात अघोषित आणीबाणी आहे. सध्याचे सत्ताधारी हे सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून ते विरोधकांना अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारला विरोध करणारे हे देशद्रोही अशी वागणूक सध्या देशात विरोधकांना मिळत आहे. बाबासाहेबांच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी आमच्याच मंडळींचा वापर ते करीत असल्याचे सांगत त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला.

रिपब्लिकन ऐक्यावर बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, यापूर्वीही रिपाइं ऐक्य झाले होते. त्याचे परिणाम आम्ही पाहिले आहेत. घोडे, गाढव, कुत्रे एकाच खोलीत एकत्र बांधणे शक्य आहे का, असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला. नेत्यांना एकत्र आणण्यापेक्षा समाजाला एकत्र आणण्यासाठी काम करणार असून, आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे ते म्हणाले. अमरावतीमध्ये या निवडणुकीसाठी सर्व संघटना एकत्र येत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेAmravatiअमरावती