शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पायी चालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघा, कंबरदुखी लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

इंदल चव्हाण-अमरावती : कामाची व्यस्तता, वाहनांचा प्रचंड वापर, कोरोनाकाळातील संचारबंदीत अकारण बाहेर फिरण्यावरील बंदी आदी अनेक कारणांमुळे पायी चालण्याची ...

इंदल चव्हाण-अमरावती : कामाची व्यस्तता, वाहनांचा प्रचंड वापर, कोरोनाकाळातील संचारबंदीत अकारण बाहेर फिरण्यावरील बंदी आदी अनेक कारणांमुळे पायी चालण्याची लोकांची सवयच मोडली आहे. त्यामुळे नको त्या वयात गुडघा, कंबरदुखीची घरघर लागली आहे. या आजाराने सध्या अनेकजण त्रस्त असल्याचे अस्थिरोगतज्ज्ञांनी सांगितले.

भाजीपाला आणण्याकरिता नागरिकांना दुकानात जावे लागत होते. त्यामुळे जवळपासच्या दुकाना पायी जाणे होत होते. लहान मुलांना शाळेत ने-आण करताना महिलांचा पायी जावे लागायचे. ज्येष्ठ वा मध्यमवयीन सकाळ-सायंकाळ वाॅकिंगकरिता जायचे. मात्र, कोरोनाकाळात संपर्क तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली. तेव्हा बहुतांश नागरिकांना घरीच थांबावे लागले. त्यामुळे अनेकांची चालण्याची सवय मोडली. त्यामुळे आता सकाळी उठून फिरायला जाण्याची काही लोकांची सवय पूर्णत: मोडली. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी वाहनाचा वापर वाढविल्याने त्यांना फिरण्यास वेळच मिळत नाही. कार्यालय ते घर वाहनावरच प्रवास होत असल्याने त्यांचे पायी चालणे बंदच झाले. अनेकांनी वर्षोगिणती सायकलीवर पाय टाकलेला नाही. त्यामुळे शरीराचा व्यायाम न झाल्याने नको त्या वयात कंबरदुखी, गुडघादुखीचा त्रास वाढीस लागला आहे.

पॉईंटर

एक किमी परिसरात जाण्यास वाहनाचा वापर टाळा.

कुठलेही काम करताना सहकार्याची मदत कमी घ्या.

घाई नसेल तर लिफ्टऐवजी पायऱ्यांनी घर गाठा.

कार्यालयापर्यंत शतपावली करावी.

बॉक्स

ज्यांना पायी चालणे शक्यच नाही त्यांनी हे करा

घरातच शरीराची हालचाल होईल, असे व्यायाम करावे. तेही शक्य नसल्यास दुसऱ्याच्या सहकार्याने शतपावली करावी.

हाता-पायाच्या नसा मोकळ्या होतील, अशा उपकरणांच्या साह्याने हालचाल करावी. यामुळे चयापचय होते, वजन कमी होण्यास मदत होते, फुफ्फुसाची क्रिया वाढते, मन प्रसन्न होते, असे आर्थोपेडिक डॉ. संजय पवार यांनी सांगितले.