शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बारावीच्या निकालाची आता लगीन घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

अमरावती : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावीच्या निकालाची लगीनघाई सुरू झाली आहे. विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणदान करण्याचे काम ...

अमरावती : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावीच्या निकालाची लगीनघाई सुरू झाली आहे. विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणदान करण्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने यासंदर्भात महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांना गुणदान करण्यात येत आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांचे गुण, श्रेणी आणि इतर माहिती मंडळाच्या संकेत स्थळावर अपलोड करावयाचे आहे. विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरल्यानंतर तपासणी करून महाविद्यालयांना ते गुण सादर करावयाचे आहे. गुण अपलोड करण्याचे काम आटोपून २३ जुलै रोजी दहावीचा अकरावी आणि बारावीच्या निकालाची संकलित इतर प्रपत्रे आणि संपूर्ण माहितीची प्रत सादर विभागीय शिक्षण मंडळाकडे २४ पर्यंत जमा करावी, अशा सूचना मंडळाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. ही गुणदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ३१ जुलै दरम्यान बारावीचा निकाल लागण्याची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दहावीच्या सर्वोच्च तीन विषयाचे गुण, अकरावीचे गुण आणि बारावीतील अंतर्गत मूल्यमापनातून मिळणारे गुण या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात येणार आहे. विविध शाखांमध्ये विविध निकष तयार करण्यात आले असून, त्यांच्या साहाय्याने गुणदान करण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये हे गुणदान पाठवण्याची प्रक्रिया केली सुरू आहे. त्यानंतर बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

कोट

सध्या बारावीच्या निकालाचे अनुषंगाने महाविद्यालय स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. निकालासंदर्भातील माहिती येत्या २४ जुलैपर्यंत मंडळाकडे प्राप्त होणार आहे.

- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती