शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा, खंडूखेड्यात तुफान गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:34 IST

फोटो पी १८ खंडूखेडा / चिखलदरा फोल्डर अमरावती : चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चिखलदरा तालुक्यात गुरूवारी ...

फोटो पी १८ खंडूखेडा / चिखलदरा फोल्डर

अमरावती : चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चिखलदरा तालुक्यात गुरूवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणात कमालीचा गारवा पसरला. खुंटीवरील स्वेटर, मफलर पुन्हा निघाले. सायंकायपर्यंत वातावरणात गारवा होता.

चिखलदरा, खंडूखेडा येथे गार

चिखलदरा : येथे गुरुवारी दुपारी २:२० वाजताच्या दरम्यान बोराच्या आकाराच्या गारा कोसळल्या. तालुक्यातील खंडूखेडा येथे दुपारी १२ च्या सुमारास तुफान गारपीट झाली. पर्यटनस्थळी दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पर्यटन स्थळ गारठले आहे.

गुरुवारी दुपारी अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटात अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १० ते १५ मिनिटापर्यंत बोराच्या आकाराचे एवढ्या गारांचा सडा कोसळू लागला. वन उद्यान, पांढरी, रेंजर कॉलेज व जंगलात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. नगरपालिकेचा वार्ड असलेल्या पांढरी भागात गारांचे थर दोन तासांपेक्षा अधिक वेळ साचून होते. परिसर पूर्णता पांढरा झाल्याचे स्थानिक रहिवासी नामदेव खडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दोन दिवसांपासून वातावरणात कमालीची घट झाली असून सर्वत्र परिसर गारठला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक सुद्धा रात्रंदिवस गरम कपडे घालण्यासह दिवसासुद्धा शेकोट्या पेटवून बसले आहेत.

--------

नांदगाव तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस.

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात कनी मिझार्पूर, नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापुर व परिसरातील गावात गुरूवारी सकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडला. काही गावात तुरळक प्रमाणात गार पडली. हरभरा कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. काही शेतक-यांनी सवंगनी केलेला हरभरा जमिनीवर पडून होता. गंजी झाकण्यासाठी शेतक-यांना धावपळ करावी लागली.

----------

चांदूर रेल्वेत पावसाच्या सरी

चांदूर रेल्वे : येथे गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. शहरात पावसाळी वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. सध्या शेतकºयांच्या शेतात गहू, हरभरा, भाजीपाला, संत्रा ही पिके आहेत. या पिकांना पाऊस व वातावरणापासून धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा विवंचनेत सापडला आहे.

---------------

धामणगाव तालुक्याला यंदाही अवकाळीचा फटका

धामणगाव रेल्वे : सहा वर्षांपासून तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकाला अवकाळीचा फटका बसत असून गुरुवारी झालेल्या अवकाळीमुळे सोंगणी केलेला एक हजार हेक्टरातील हरभरा जमीनदोस्त झाला तर तीनशे हेक्टरातील गहू झालेल्या तुरळक गारपीट व वादळी पावसाने झोपला आहे.

------------