शहरं
Join us  
Trending Stories
1
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
2
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
3
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
4
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
5
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
6
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
7
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
8
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
9
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
10
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
11
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
12
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
13
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
14
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
15
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
16
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
17
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं

चार हजार किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:01 IST

जीवनाआवश्यक वस्तू वगळता इतर कुठलाही व्यवसायास संचारबंदीत प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याकारणाने २० दिवसांहून अधिक काळासाठी आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली. अजून किमान तीन आठवडे तरी त्यांना व्यवसाय सुरू करता येणार नाही. त्यामुळे आता चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देप्रतिदिन दोन कोटींची उलाढाल ठप्प : २५ दिवसांपासून व्यवसाय बंद

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘कोरोना’ विषाणूचा सामुदायिक संसर्ग टाळण्याकरिता २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. या कालावधीत हातगाडीवर किरकोळ खाद्यपदार्थ विकणारे जिल्ह्यातील साडेतीन ते चार हजार विक्रेते तसेच चहा कँटीन व अशा किरकोळ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यावसायिकांची सरासरी एक ते दोन कोटींची दैनंदिन उलाढाल सद्यस्थितीत ठप्प आहे.शहरात पाणीपुरी, भेळ, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या, छोटेखानी हॉटेल, चहा कँटीन यांची जिल्ह्यात संख्या साडेतीन ते चार हजार असल्याची माहिती अन्न व प्रशासन विभागाने दिली आहे. शहरात फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या यामध्ये अधिक आहे. सदर व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भरवशावर हजारो व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. ‘रोजचे कमावणे व रोज खाणे’ अशी परिस्थिती असलेल्या हजारो व्यावसायिकांना व्यवसायाची गाडी रुळावर आणण्यासाठी ३ मे पर्यंत वाट बघावी लागणार आहे.जीवनाआवश्यक वस्तू वगळता इतर कुठलाही व्यवसायास संचारबंदीत प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याकारणाने २० दिवसांहून अधिक काळासाठी आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली. अजून किमान तीन आठवडे तरी त्यांना व्यवसाय सुरू करता येणार नाही. त्यामुळे आता चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. किमान एक किरकोळ व्यावसायिक दररोज किमान दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत व्यवसाय करतो. त्यामुळे जिल्ह्यात अशा व्यवसायिकांची ८० लाख ते दोन कोटी दैनंदिन उलाढाल असते. त्यामुळे अशा व्यावसायिकांचे लॉडाऊनच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आणखीन १७ दिवस लॉकडाऊन आहे.कुणाला बँकेची किंवा इतर कर्जाची किस्त भरायची असते. कुणाला एलआयसी पॉलिसीचा हप्ता भरायचा असतो किंवा तातडीची वैद्यकीय सेवा घ्यावी लागते. अनेक किरकोळ व्यवसायिक भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्यापुढे भाडे चुकविण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.लहान हॉटेल, किरकोळ व्यावसायिक, हातगाडीधारक, चहा कँटीन तसेच इतर खाद्यपदार्थ व्यावसायिक जिल्ह्यात साडेतीन ते चार हजार आहेत. अनेकांची एफडीएकडे नोंदणी झाली आहे.- सचिन केदारे, सहायक आयुक्त, अन्न व प्रशासन विभाग, अमरावती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या