शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो वारकऱ्यांचे पंढरपूरकडे कूच

By admin | Updated: June 29, 2017 00:24 IST

पुंडलिक वरदे..हरी विठ्ठलच्या गजरात तब्बल १९५ वारकरी पहिल्या विशेष रेल्वेने नया अमरावती रेल्वे स्थानकावरून बुधवारी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे रवाना झाले.

पहिली विशेष रेल्वे रवाना : विठू नामाचा गजर, भक्तांचा उत्साह लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुंडलिक वरदे..हरी विठ्ठलच्या गजरात तब्बल १९५ वारकरी पहिल्या विशेष रेल्वेने नया अमरावती रेल्वे स्थानकावरून बुधवारी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे रवाना झाले. विठुरायाच्या दर्शनाच्या अनामिक ओढीने धुंद झालेल्या वारकऱ्यांच्या उत्साहामुळे परिसरात देखील चैतन्य निर्माण झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे सुरू करण्याची घोषणा रेल्वे विभागाने केली होती. त्यानुसार मध्य रेल्वे विभागाने पंढरपूर रेल्वे विशेष गाडी विठ्ठल भक्तांसाठी सुरू केली आहे. नया अकोला येथून बुधवारी रेल्वे बडनेरा सीसीआय एस.सी. सयाम यांच्या हस्ते या विशेष रेल्वेला सुरूवात करण्यात आली. गुरूवार २९ जून रोजी दुसऱ्या रेल्वेला दुपारी दोन वाजता महापालिका स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना केले जाईल. पंढरपूरकडे आज रवाना झालेल्या गाडीचे चालक म्हणून एस.वाय.कोहाडे तर सहचालक म्हणून एन. चंद्रा होते. गाडीचे गार्ड उमेश राम होते. पंढरपूरकडे रवाना झालेल्या विशेष गाडीसाठी पहिल्या दिवशी १५४ तिकिटांची विक्री करण्यात आली असून १९५ प्रवासी रवाना झाल्याची नोंद आहे. पहिल्या दिवशी २९ हजार ३० रुपयांचे तिकिट विक्रीतून उत्पन्न मिळाले आहे. नया अमरावती रेल्वे स्थानकाहून गुरूवार २९ जून त्यानंतर १, वन२ जुलै रोजी दुपारी २ वाजता विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना होईल. पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन २९, ३० जून तर १ व २ जुलै रोजी १० वाजून ४० मिनिटांनी ही गाडी अमरावतीसाठी परतीचा प्रवास करेल. पंढरपूर विशेष रेल्वे गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदूरा, मलकापूर, बोदवड, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, खामगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगाव, जेजूर, खुर्दवाडी, पंढरपूर असे थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी २० डब्यांची असून यात १८ डबे सामान्य व आरक्षण तर दोन डबे एसएलआरचे आहेत.आज सुटणार दुसरी विशेष गाडीविठ्ठलभक्तांना घेऊन उद्या गुरूवारी दुपारी दोन वाजता दुसरी विशेष रेल्वे रवाना होणार आहे. आरक्षण व विनाआरक्षण अशी रेल्वे गाडीत सोय आहे. वारकऱ्यांसाठीच ही रेल्वे सुरु करण्यात आली आहे. रेल्वेने प्रवास करताना तिकिट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन बडनेरा सीसीआय एस.सी. सयाम यांनी केले आहे.