शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

शेकडो वारकऱ्यांचे पंढरपूरकडे कूच

By admin | Updated: June 29, 2017 00:24 IST

पुंडलिक वरदे..हरी विठ्ठलच्या गजरात तब्बल १९५ वारकरी पहिल्या विशेष रेल्वेने नया अमरावती रेल्वे स्थानकावरून बुधवारी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे रवाना झाले.

पहिली विशेष रेल्वे रवाना : विठू नामाचा गजर, भक्तांचा उत्साह लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुंडलिक वरदे..हरी विठ्ठलच्या गजरात तब्बल १९५ वारकरी पहिल्या विशेष रेल्वेने नया अमरावती रेल्वे स्थानकावरून बुधवारी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे रवाना झाले. विठुरायाच्या दर्शनाच्या अनामिक ओढीने धुंद झालेल्या वारकऱ्यांच्या उत्साहामुळे परिसरात देखील चैतन्य निर्माण झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे सुरू करण्याची घोषणा रेल्वे विभागाने केली होती. त्यानुसार मध्य रेल्वे विभागाने पंढरपूर रेल्वे विशेष गाडी विठ्ठल भक्तांसाठी सुरू केली आहे. नया अकोला येथून बुधवारी रेल्वे बडनेरा सीसीआय एस.सी. सयाम यांच्या हस्ते या विशेष रेल्वेला सुरूवात करण्यात आली. गुरूवार २९ जून रोजी दुसऱ्या रेल्वेला दुपारी दोन वाजता महापालिका स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना केले जाईल. पंढरपूरकडे आज रवाना झालेल्या गाडीचे चालक म्हणून एस.वाय.कोहाडे तर सहचालक म्हणून एन. चंद्रा होते. गाडीचे गार्ड उमेश राम होते. पंढरपूरकडे रवाना झालेल्या विशेष गाडीसाठी पहिल्या दिवशी १५४ तिकिटांची विक्री करण्यात आली असून १९५ प्रवासी रवाना झाल्याची नोंद आहे. पहिल्या दिवशी २९ हजार ३० रुपयांचे तिकिट विक्रीतून उत्पन्न मिळाले आहे. नया अमरावती रेल्वे स्थानकाहून गुरूवार २९ जून त्यानंतर १, वन२ जुलै रोजी दुपारी २ वाजता विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना होईल. पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन २९, ३० जून तर १ व २ जुलै रोजी १० वाजून ४० मिनिटांनी ही गाडी अमरावतीसाठी परतीचा प्रवास करेल. पंढरपूर विशेष रेल्वे गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदूरा, मलकापूर, बोदवड, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, खामगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगाव, जेजूर, खुर्दवाडी, पंढरपूर असे थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी २० डब्यांची असून यात १८ डबे सामान्य व आरक्षण तर दोन डबे एसएलआरचे आहेत.आज सुटणार दुसरी विशेष गाडीविठ्ठलभक्तांना घेऊन उद्या गुरूवारी दुपारी दोन वाजता दुसरी विशेष रेल्वे रवाना होणार आहे. आरक्षण व विनाआरक्षण अशी रेल्वे गाडीत सोय आहे. वारकऱ्यांसाठीच ही रेल्वे सुरु करण्यात आली आहे. रेल्वेने प्रवास करताना तिकिट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन बडनेरा सीसीआय एस.सी. सयाम यांनी केले आहे.