शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
8
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
9
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
10
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
11
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
12
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
13
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
14
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
15
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
16
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
17
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
18
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
19
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
20
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

पंढरी मध्यम प्रकल्पावर शेकडो प्रकल्पग्रस्तांचे अन्न-जलत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:17 IST

पंढरी मध्यम प्रकल्प, दाभी प्रकल्पग्रस्तांनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात पंढरी मध्यम प्रकल्पावर शुक्रवारपासून अन्न-जलत्याग आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पस्थळी येऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता जलसमाधी घेणार असल्याचे आंदोलनकांनी जाहीर केले. या आंदोलनाने भाजपाला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा होत आहे.

ठळक मुद्देदुपारपर्यंत अल्टिमेटम : मुख्यमंत्र्यांनी भेट न घेतल्यास जलसमाधी

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड/पुसला : पंढरी मध्यम प्रकल्प, दाभी प्रकल्पग्रस्तांनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात पंढरी मध्यम प्रकल्पावर शुक्रवारपासून अन्न-जलत्याग आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पस्थळी येऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता जलसमाधी घेणार असल्याचे आंदोलनकांनी जाहीर केले. या आंदोलनाने भाजपाला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा होत आहे.१२ वर्षांपासून अपूर्ण प्रकल्प पूर्ण व्हावा, शेतकऱ्यांना नवीन दरानुसार फरकाची रक्कम, मोबदला तातडीने अदा करावा, स्थानिक मच्छीमार संस्था निर्माण करण्याची परवानगी भोई समाजाला द्यावी, प्रकल्पग्रस्त दाखला परत घेऊन १० लाख रोख द्यावे, खापरखेडा पुनर्वसनकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी आदी मागण्या आंदोलकांनी मांडल्या. शुक्रवारी सकाळी ९ पासून विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात अन्न-जलत्याग आंदोलनास प्रारंभ झाला. १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आंदोलनस्थळी येऊन मागण्या मंजूर कराव्या, अन्यथा कोणत्याही क्षणी शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आंदोलनाला काँग्रेससह अन्य संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. शेंदूरजनाघाट ठाणेदार शेषराव नितनवरे यांनी शेकडो पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.भाजपचे विजय श्रीराव, प्रभाकर काळे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विक्रम ठाकरे, उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, पुसला ग्रामपंचायत सरपंच सारिका चिमोटे, उपसरपंच अतुल बगाडे, गजानन डाहाके, भाजपचे इंद्रभूषण सोंडे, स्वप्निल मांडळे, धनराज तडस, सुभाष डोंगरे, चंद्रशेखर ढोरे, नरेंद्र कुरवाळे, राजू बागडे, मोतीराम ताटस्कर, अजाब राहुरकर, सुधाकर पाटील, विलास पवार, नितीन ढोरे, दानाजी फरकाडे, लीलाधर खराळकर, मनोज डोंगरे, सरंपच जानराव उईके, अजाब बोदड, सकू धुर्वे, प्रशांत अजमिरे, राजेंद्र राजूरकर, बाबाराव डहाके, राजू वरूडकर, गणेश वानखडे, गजानन कुरवाळेसह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, प्रकल्पस्थळी जमाव पाहून अधिकाºयांनी ऐनवेळी मशिन बाहेर काढून कामाचा देखावा केल्याची चर्चा होती.