शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पंढरी मध्यम प्रकल्पावर शेकडो प्रकल्पग्रस्तांचे अन्न-जलत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:17 IST

पंढरी मध्यम प्रकल्प, दाभी प्रकल्पग्रस्तांनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात पंढरी मध्यम प्रकल्पावर शुक्रवारपासून अन्न-जलत्याग आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पस्थळी येऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता जलसमाधी घेणार असल्याचे आंदोलनकांनी जाहीर केले. या आंदोलनाने भाजपाला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा होत आहे.

ठळक मुद्देदुपारपर्यंत अल्टिमेटम : मुख्यमंत्र्यांनी भेट न घेतल्यास जलसमाधी

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड/पुसला : पंढरी मध्यम प्रकल्प, दाभी प्रकल्पग्रस्तांनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात पंढरी मध्यम प्रकल्पावर शुक्रवारपासून अन्न-जलत्याग आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पस्थळी येऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता जलसमाधी घेणार असल्याचे आंदोलनकांनी जाहीर केले. या आंदोलनाने भाजपाला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा होत आहे.१२ वर्षांपासून अपूर्ण प्रकल्प पूर्ण व्हावा, शेतकऱ्यांना नवीन दरानुसार फरकाची रक्कम, मोबदला तातडीने अदा करावा, स्थानिक मच्छीमार संस्था निर्माण करण्याची परवानगी भोई समाजाला द्यावी, प्रकल्पग्रस्त दाखला परत घेऊन १० लाख रोख द्यावे, खापरखेडा पुनर्वसनकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी आदी मागण्या आंदोलकांनी मांडल्या. शुक्रवारी सकाळी ९ पासून विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात अन्न-जलत्याग आंदोलनास प्रारंभ झाला. १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आंदोलनस्थळी येऊन मागण्या मंजूर कराव्या, अन्यथा कोणत्याही क्षणी शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आंदोलनाला काँग्रेससह अन्य संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. शेंदूरजनाघाट ठाणेदार शेषराव नितनवरे यांनी शेकडो पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.भाजपचे विजय श्रीराव, प्रभाकर काळे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विक्रम ठाकरे, उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, पुसला ग्रामपंचायत सरपंच सारिका चिमोटे, उपसरपंच अतुल बगाडे, गजानन डाहाके, भाजपचे इंद्रभूषण सोंडे, स्वप्निल मांडळे, धनराज तडस, सुभाष डोंगरे, चंद्रशेखर ढोरे, नरेंद्र कुरवाळे, राजू बागडे, मोतीराम ताटस्कर, अजाब राहुरकर, सुधाकर पाटील, विलास पवार, नितीन ढोरे, दानाजी फरकाडे, लीलाधर खराळकर, मनोज डोंगरे, सरंपच जानराव उईके, अजाब बोदड, सकू धुर्वे, प्रशांत अजमिरे, राजेंद्र राजूरकर, बाबाराव डहाके, राजू वरूडकर, गणेश वानखडे, गजानन कुरवाळेसह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, प्रकल्पस्थळी जमाव पाहून अधिकाºयांनी ऐनवेळी मशिन बाहेर काढून कामाचा देखावा केल्याची चर्चा होती.