शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे पुरावे तरीही आरक्षणापासून वंचित !

By admin | Updated: September 22, 2016 00:19 IST

आज केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकात ६९ टक्के, आंध्रप्रदेश व राजस्थानात ६५ टक्के, फक्त महाराष्ट्रात ५२ टक््के अशी आरक्षणाची राज्याची स्थिती आहे़...

८२ टक्के मराठ्यांची उपजिवीका शेतीवरच : साडेतीन हजार पैकी तीन हजार आत्महत्या मराठा शेतकऱ्यांच्यामोहन राऊत धामणगाव रेल्वेआज केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकात ६९ टक्के, आंध्रप्रदेश व राजस्थानात ६५ टक्के, फक्त महाराष्ट्रात ५२ टक््के अशी आरक्षणाची राज्याची स्थिती आहे़ तब्बल दिडशे पुरावे देवूनही मराठा समाजाला आरक्षणापासून दुर ठेवण्यात येत असल्यामुळे राज्यात मागील १५ वर्षात ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नापीकी मुळे झाल्या़ त्यात साडेतीन हजारा पैकी तीन ह जार मराठा कुणबी बांधवांची असून आजही ८० टक््के हा समाज शेतीच्या उपजिवीकेवर अवलंबून आहे़ अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेच्या निमीत्याने राज्यभरातील मराठा अन्यायाविरूध्द पेटला आहे़अ‍ॅट्रासिटी कायद्यातील बदल आणी स्वामिनाथन आयोग लागू करणे या नेहमीच्या मागण्याशिवाय चित्रपट व नटाकातून समाजाची बदनामी थांबवा मराठा समाजाला आरक्षण घोषीत करावे या विविध मागण्यासाठी आज अमरावतीत मराठी क्रांती मोर्चा निघणार आहे़ मराठा आरक्षण संदर्भात या समाजाची न्यायालयीन लढाई सूरू आहे़ गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून शासन प्रयत्न करीत असल्याचे सरकार आपली भुमिका मांडते़ परंतू या समाजाला आरक्षणापासून किती दिवस वंचित ठेवणार असा प्रश्न निर्माण होत आहे़महाराष्ट्रात ५२ टक्के आरक्षण आहे़ इतर राज्यात यापेक्षा अधीक आहे़ राजकीय सत्तेत मराठा समाजाचे अधीक प्रतीनिधी असले तरी ग्रामीण भागात आज या समाजाची स्थिती अत्यंत हलाखीची आहे़ अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत खोट्या तक्रारी करून सर्वाधिक गुन्हे दाखल करण्याचा प्रकार वाढल्याने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये सुधारणा व्हावी, त्यात अटकपूर्व जामिनाची तरतूद व्हावी, ९५ टक्के प्रकरणातील खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद होणे गरजेचे आहे़ अनेक प्रश्नांसोबतच आरक्षणाची गंभीर समस्या उभी असल्याची प्रतिक्रिया मराठा युवकांनी व्यक्त केल्या आहे़राष्ट्रगीतात मराठा पण सवलतीपासून वंचित मराठा समाजातील बांधव मूळात लढवय्या व काटक आहे़े़ देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो़ भारतीय सैन्यामध्ये मराठा बटालीयन आहे़ मराठा मेला तर राष्ट्रही मेले, मराठा वीना राष्ट्र गाडा न चाले असे म्हटले जाते़ महाराष्ट्रात राहणारा व मराठी बोलणारा तो मराठा हे स्पष्ट आहे़ शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बारा बलुतेदार मावळ्यांना मराठा संबोधले जात होते़ १८८१ च्या जनगणनेमध्ये मराठा व कुणबी या भिन्न जाती नसून एकच आहेत. बॉम्बे गॅझेटीयर प्रमाणे मराठा व कुणब्यांमध्ये भेदाभेद नाही़ गॅझेटीयर आॅफ इंडियानुसार मराठा-कुणबी यांच्यात फरक नाही़ शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी हे सर्वदूर परिचित आहे़ १ जून २००४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या ८३ व्या दुरूस्तीप्रमाणे मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना आरक्षणाचा लाभ मिळावामराठा समाजाच्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्यामराठा समाजाची आर्थिक स्थिती वाईट असल्याने या समाजातील ८० टक्के तरूण दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. मराठा समाजातील ८२ टक्के लोक शेतीवर उपजिविका चालवित आहे़ नापिकीमुळे मराठा-कुणबी समाजातील तीन हजारांहून अधीक समाजबांधवांनी हलाखीच्या आर्थिक स्थितीमुळे आत्महत्या केल्या आहेत़ त्यामुळे आरक्षणाचा लाभ घेण्यास हा समाज पात्र आहे़ समाजाची संख्या मोठी असल्याने समस्याही मोठ्या प्रमाणात आहेत. सहकार चळवळीत मराठा समाजाचे मोठे योगदान असले तरी सरकारी धोरणामुळे सहकार चळवळ मोडकळीस येत आहे़