शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दावा दीड लाखांचा, सेट टॉप बॉक्स लागले २१ हजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 00:09 IST

डिसेंबर १५ अखेर जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका अािण नगरपंचायत क्षेत्रात सेट टॉप बॉक्स बसविणे अनिवार्य केल्यानंतर ...

प्रशासनाची घिसाडघाई : अंमलबजावणी संथ, मुदतवाढ मिळण्याची शक्यताअमरावती : डिसेंबर १५ अखेर जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका अािण नगरपंचायत क्षेत्रात सेट टॉप बॉक्स बसविणे अनिवार्य केल्यानंतर झाकलेले ‘केबल कनेक्शन’ उघड होतील आणि केबल कनेक्शनची संख्या वाढेल, हा महसूल प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. जिल्ह्यात ५७ हजार केबल ग्राहक असल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता. प्रत्यक्षात शहर आणि तालुकास्तरावर ४२,२१४ केबल ग्राहकांची संख्या असून आतापर्यंत २०७१४ सेट टॉप बॉक्स बसविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात एकाच घरात दोन-तीन कनेक्शन मिळून शहरातच केबल जोडणी संख्या एक लाखावर असल्याचे सांगितले जाते. ३१ डिसेंबरला रात्री १२ च्या ठोक्याला एनॉलॉग सिस्टम बंद करण्यात आल्याने सेट टॉप बॉक्स न बसविण्याऱ्या ग्राहकांचे केबल जोडणी बंद करण्यात आले आणि पर्यायाने शहर तथा जिल्ह्याच्या विविध भागातील टीव्हीचे प्रक्षेपण बंद झाले व भडका उडाला. प्रेक्षपण बंद झाल्यानंतर ग्राहकांनाही जाग आला व सेट टॉपबॉक्सची मागणी वाढली. आता जिल्ह्यातून मागणी वाढल्याने आणि अपेक्षित पुरवठा होत नसल्याने केबल आॅपरेटर्स आणि ग्राहकांमध्ये दर दिवशी वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. कायदाव सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची भीती असताना महसूल प्रशासनात मात्र ढिम्म आहे. केबल संचालक आणि केबल आॅपरेटर्समध्ये निर्माण झालेला सवतासुभा निस्तरण्यासाठी प्रशासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही. प्रशासनाचा दीड लाख केबल ग्राहक आणि महसुलाचा दावा तूर्तास तरी फोल ठरण्याची अधिक शक्यता आहे. सेट टॉप बॉक्सची मागणी नोंदविल्यानंतरही वेळेत ‘इंस्टालेशन’ होत नसल्याने अनेक ग्राहक डीटीएच व अन्य पर्यायाकडे वळले आहे. ३१ डिसेंबरअखेरपर्यंत जेमतेम २१ हजार सेटटॉप बॉक्स लावल्या गेले असताना बहुविध यंत्रणा परिचालकांवर कुठलीही कारवाई दिशा निश्चित करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)काय होत्या सूचना ?संबंधित बहुविध यंत्रणा परिचालकांद्वारा (एमएसओ) नागरिकांना ३१ डिसेंबर २०१५ किंवा त्यानंतरही मागणीनुसार सेटटॉपबॉक्स उपलब्ध करून द्यावेत. तसेच न झाल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याकरिता संबंधित बहुविध यंत्रणा परिचालकांना जबाबदार धरण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या. दर तफावतीमुळे संभ्रमसेटटॉप बॉक्सच्या केबल संचालकांकडून वेगवेगळ्या किंमती आकारण्यात आल्या. त्यात ‘इंस्टॉलेशन चार्ज’च्या नावाखालीसुद्धा एक्स्ट्रा ३०० रुपये घेण्यात आले. १२०० पासून पुढे २४०० पर्यंत सेटटॉप बॉक्स उपलब्ध असताना पुरेशा जनजागृतीअभावी सामान्य ग्राहक संभ्रमित झाला आणि याच संभ्रमावस्थेत ३१ डिसेंबर २०१५ उलटून गेली. निव्वळ ...... बैठकाजिल्ह्यात हजारो कुटुंबीयांकडील टिव्ही संच सेटटॉप बॉक्स विना शो-पीस बनल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने फक्त जोरबैठका घेऊन सूचना करण्याचे काम केले, असा आरोप आता होवू लागला आहे. विशेष म्हणजे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सेटटॉप बॉक्स अनिवार्यतेसाठी ३ आॅक्टोबर, २१, २३ आॅक्टोबर व १६ डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठकी घेण्यात आल्या आणि नेहमीप्रमाणे मुदत संपल्यानंतरच ग्राहकांसोबतच केबल संचालक, आॅपरेटर्स आणि महसूल यंत्रणेची दाणादाण उडाली. सेट टॉप बॉक्ससंदर्भात कुठलीही मुदतवाढ देण्यात आली नाही. मुदत संपल्यानंतर मागणी वाढली असली तरी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली नाही. याबाबत ग्राहकांनीही खबरदारी घ्यायची असून तहसीलदारांकडे तक्रार करावी.- प्रवीण ठाकरे, उपविभागीय अधिकारी, अमरावती.