शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

तूर डाळ विक्रीत प्रचंड लूट शासनादेशाला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:02 IST

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत विक्री करण्यात आलेल्या तूरडाळीसाठी रास्त भाव दुकानदार जादा रक्कम वसूल करीत ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. यासंदर्भात नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली आहे.

ठळक मुद्देपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : नगरसेवक तिरमारे यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत विक्री करण्यात आलेल्या तूरडाळीसाठी रास्त भाव दुकानदार जादा रक्कम वसूल करीत ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. यासंदर्भात नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली आहे.राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत तुरीची भरडाई केल्यानंतर डाळीची विक्री राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून करण्याबाबत निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात आला आहे. तूरडाळीची विक्री सर्व शिधापत्रकधारकांना धान्य दुकानदारांमार्फत वितरण करण्याच्या सूचना ३० नोव्हेंबर २०१७ च्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आल्या होत्या. तूरडाळीची विक्री अधिक व्हावी, या उद्देशाने स्वस्त धान्य दुकानदारांकडून सर्वप्रथम ५५ रुपये किलोप्रमाणे तूरडाळ विक्री करण्यात आली. मात्र, एक महिन्यापूर्वी १४ जून रोजी तूरडाळ विक्रीसंदर्भात शासनाने नवीन निर्णय जारी करीत ३५ रुपयांत तूरडाळ विक्रीस आणली. मात्र, या शासन आदेशाला एक महिना लोटूनही स्थानिक पुरवठा विभाग स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत ५५ रुपयांनीच ग्राहकांना तूर डाळ विक्री होत आहे. तहसील कार्यालयाजवळ असलेल्या धान्य गोदामात अंदाजे ५२५ क्विंटल तूरडाळ अद्यापही उपलब्ध असून, पुरवठा विभाग ती स्वस्त धान्य दुकानदारांना विक्रीस का देत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे दादशासनाचा आदेश निघून एक महिना होत असतानाही स्थानिक पुरवठा विभागाकडून ३५ रुपये प्रतिकिलोने ग्राहकांना तूर डाळ दिली जात नाही. पुरवठा विभागाचे याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असून, ग्राहकांची पिळवणूक होत आहे, अशी तक्रार नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व चांदूर बाजारच्या तहसीलदारांकडे केली आहे.५५ रुपये किमतीची तूर डाळ ३५ रुपये प्रतिकिलो दराने वाटप करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार पाकिटावरील किमती कमी करून लवकरच ग्राहकांना मिळणार आहे.- रूपाली सोळंके,पुरवठा निरीक्षक