शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

तूर डाळ विक्रीत प्रचंड लूट शासनादेशाला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:02 IST

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत विक्री करण्यात आलेल्या तूरडाळीसाठी रास्त भाव दुकानदार जादा रक्कम वसूल करीत ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. यासंदर्भात नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली आहे.

ठळक मुद्देपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : नगरसेवक तिरमारे यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत विक्री करण्यात आलेल्या तूरडाळीसाठी रास्त भाव दुकानदार जादा रक्कम वसूल करीत ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. यासंदर्भात नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली आहे.राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत तुरीची भरडाई केल्यानंतर डाळीची विक्री राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून करण्याबाबत निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात आला आहे. तूरडाळीची विक्री सर्व शिधापत्रकधारकांना धान्य दुकानदारांमार्फत वितरण करण्याच्या सूचना ३० नोव्हेंबर २०१७ च्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आल्या होत्या. तूरडाळीची विक्री अधिक व्हावी, या उद्देशाने स्वस्त धान्य दुकानदारांकडून सर्वप्रथम ५५ रुपये किलोप्रमाणे तूरडाळ विक्री करण्यात आली. मात्र, एक महिन्यापूर्वी १४ जून रोजी तूरडाळ विक्रीसंदर्भात शासनाने नवीन निर्णय जारी करीत ३५ रुपयांत तूरडाळ विक्रीस आणली. मात्र, या शासन आदेशाला एक महिना लोटूनही स्थानिक पुरवठा विभाग स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत ५५ रुपयांनीच ग्राहकांना तूर डाळ विक्री होत आहे. तहसील कार्यालयाजवळ असलेल्या धान्य गोदामात अंदाजे ५२५ क्विंटल तूरडाळ अद्यापही उपलब्ध असून, पुरवठा विभाग ती स्वस्त धान्य दुकानदारांना विक्रीस का देत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे दादशासनाचा आदेश निघून एक महिना होत असतानाही स्थानिक पुरवठा विभागाकडून ३५ रुपये प्रतिकिलोने ग्राहकांना तूर डाळ दिली जात नाही. पुरवठा विभागाचे याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असून, ग्राहकांची पिळवणूक होत आहे, अशी तक्रार नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व चांदूर बाजारच्या तहसीलदारांकडे केली आहे.५५ रुपये किमतीची तूर डाळ ३५ रुपये प्रतिकिलो दराने वाटप करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार पाकिटावरील किमती कमी करून लवकरच ग्राहकांना मिळणार आहे.- रूपाली सोळंके,पुरवठा निरीक्षक