शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसासह प्रचंड गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2016 23:58 IST

रविवारी दुपारी साडेतीन वाजतादरम्यान वादळी पावसासह गारपिटीने जिल्ह्याला झोडपले.

चांदूरबाजार तालुक्यात कहर : बाजार समितीत पाणीच पाणी, जिल्हाभरात पावसाची हजेरीचांदूरबाजार (अमरावती) : रविवारी दुपारी साडेतीन वाजतादरम्यान वादळी पावसासह गारपिटीने जिल्ह्याला झोडपले. चांदूरबाजार, परतवाडा, चिखलदरा, यावली, चांदूररेल्वे परिसरातही पावसाने आकस्मिक हजेरी लावली. मात्र, चांदूरबाजार तालुक्यात तब्बल अर्धा तास सुरू असलेल्या प्रचंड गारपिटीमुळे पिकांसह बाजार समितीतील शेतमालाची देखील हानी झाली. तालुक्यात सगळीकडे गारांचा खच साचला होता. आठवडी बाजारात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, तर बाजार समितीतील कोट्यवधींचा मालही पावसाने भिजला. रविवारी दुपारपासून वातावरणात बदल झाला आणि क्षणार्धात सोसाट्याचे वारे, पाऊस आणि गारपीट सुरू झाली. रविवार हा चांदूरबाजारचा आठवडी बाजाराचा दिवस. हजारो नागरिक या बाजारात ग्रामीण भागातून खरेदीसाठी येतात. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची व नागरिकांची त्रेधा उडाली. आठवडी बाजारातील भाजीपाला व धान्य विक्रेत्यांची या पावसामुळे प्रचंड हानी झाली. बाजारात आलेल्या ग्राहकांना मिळेल त्या ठिकाणी अर्धा तास आसरा घ्यावा लागला. शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीतदेखील धान्य बाजाराचा दिवस असल्यामुळे तूर, हरभरा, गहू हा माल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. बाजार समतीमध्ये रविवारी तब्बल आठ हजार पोत्यांची आवक झाली होती. यापैकी सहा हजार पोते धान्य पावसात चिंब भिजले. बाजार समितीच्या आवारात एक फूटपर्यंत पाणी साचल्याने विक्रीसाठी खाली टाकलेले धान्य अक्षरश: पाण्यावर तरंगत होते. नुकसानीचे सर्वेक्षण सुरू चांदूरबाजार : त्यावर गारांचा थरही जमा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेदेखील कोट्यवधींचे नुकसान झाले. शहरासह तालुक्यातील दिलालपूर, जसापूर, माधान, हैदतपूर, ब्राह्मणवाडा थडी, शिरजगाव कसबा, करजगावसह अनेक गावांना गारपीट व वादळी पावसाचा तडाखा बसला. इतर गावांची माहिती महसूल यंत्रणेमार्फत प्राप्त झाली नाही. गारपीट व वादळी पावसात कांदा, गहू, संत्रा, हरभरा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्याकरिता महसूल यंत्रणा प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करीत आहे. त्यांच्या अहवालानंतरच गारपीटग्रस्त गावांची संख्या व नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करीत आहे. त्यांच्या अहवालानंतरच गारपीटग्रस्त गावांची संख्या व नुकसानीचा आकडा अधिकृतरीत्या प्राप्त होईल. ७० वर्षांत पहिल्यांदाच प्रचंड गारामागील ७० वर्षांत कधी नव्हे तो पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यात गारपीट झाल्याची माहिती परिसरातील वयोवृध्द नागरिक देत आहेत. ७० वर्षांपूर्वी छावणीची घरे असताना अशी गारपीट झाली होती आणि गारांचे थरच्या थर साचले होते, असे जाणकारांनी चिखलदऱ्यातही गारपीट, परतवाड्यात मुसळधारपरतवाडा/चिखलदरा : रविवारी सायंकाळी ५.३० वाजतापासून अचलपूर-परतवाडा शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. चिखलदरा व परिसरात तुरीच्या आकाराची गारपीट झाली. सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस उशिरा रात्रीपर्यत सुरूच होता. वादळी पावसाने अचलपूर-परतवाडा शहरात अनेक होर्डिंग्ज कोसळले. हातगाडया धारकांची आणि उघड्यावर दुकाने थाटणाऱ्यांची या पावसामुळे एकच तारांबळ उडाली. विद्युत पुरवठादेखील काही काळ खंडित झाला होता. या पावसाचा गहू, कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. धामणगाव गढी, एकलासपूर, परसापूर, पथ्रोट परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, या वादळी पावसाने चिखलदरा व परतवाडा-अचलपूर तालुक्यात कोणतीही जिवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रविवारी झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील ३०० हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाची नासाडी झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. - किरण गित्ते, जिल्हाधिकारी