शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश कसे होणार? मनासारखे कॉलेज मिळण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:15 IST

(असायमेंट) दहावीचा निकाल वाढला, उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश अमरावती : यंदा दहावीचा ऑनलाईन निकाल डोळे दीपवून ...

(असायमेंट)

दहावीचा निकाल वाढला, उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश

अमरावती : यंदा दहावीचा ऑनलाईन निकाल डोळे दीपवून टाकणारा ठरला. बहुतांश विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त, प्रथमश्रेणी झळकले. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) उच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाली. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या जागा कमी, दहावीचा निकाल जास्त अशी स्थिती आहे. गुणी विद्यार्थी चिंतेत असून, मनासारखे कॉलेज मिळेल अथवा नाही, अशा द्विधा मनस्थितीत आहेत.

उच्च न्यायालयाने दहावीच्या गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश सहा आठवड्यात करण्याचे आदेश जारी केले आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाला सीईटी परीक्षेचा गाशा गुंडाळावा लागला आहे. आता दहावीच्या गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश मिळेल, अशी नियमावली आहे. जिल्ह्यात दहावीचे ३८९६४ विद्यार्थी उत्तीर्ण असून, गुणांच्या आधारे त्यांना अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे.

-------------------

विद्यार्थी स्थिती

दहावी : ३८९६४

अकरावी प्रवेशाची क्षमता : १५६७० (अमरावती महानगर)

-------------

अशी आहे शहरात शाखानिहाय जागा

कला : ३३७०

वाणिज्य : २४०३

विज्ञान : ६५४०

एमसीव्हीसी : ३०२०

-----------------

महाविद्यालयांचा ‘कट ऑफ’ वाढणार

यंदा दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढली आहे. ९९.५७ टक्के निकाल लागला आहे. अकरावी प्रवेशासाठी ३१० जागा वाढल्या आहेत. तथापि, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे नियोजन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती राबविणार असल्याची माहिती समन्वयक अरविंद मंगळे यांनी दिली.

------------------

विद्यार्थी चितेंत

यंदा दहावीचा निकालानंतर अकरावी प्रवेश मनासारख्या कॉलेजमध्ये मिळावा, यासाठी सीईटीची तयारी चालविली. मात्र, आता सीईटी नाही, थेट प्रवेश मिळणार आहे. यात गुणी विद्यार्थ्यांचे नक्कीच नुकसान होणारे आहे.

- चुटकी रोकडे, विद्यार्थिनी

----------------

दहावीचा निकाल जंबो लागला. त्यामुळे कोणत्या कॉलेजमध्ये कसा प्रवेश मिळेल, याचे तूर्त सांगता येणार नाही. मात्र, सीईटी परीक्षा झाली असती, तर यात खरे हुशार विद्यार्थी कोण, हे समोर आले असते. आता अकरावी प्रवेशात गुणी विद्यार्थांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.

- अल्पेश वानखडे, विद्यार्थी,

---------------------

कोट

१६ ऑगस्टपासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू होत आहे. यंदा नक्कीच ‘ कट ऑफ’ वाढेल, असे संकेत आहेत. सीईटी परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा होईल.

- दीपक धोटे, प्राचार्य, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय.

---------

कोट

- राजेश देशमुख, प्राचार्य, बॅ. आर.डी,आय.के.महाविद्यालय