शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
2
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
5
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
6
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
7
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
8
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
9
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
10
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
11
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
12
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
13
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
14
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
15
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
16
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
17
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
18
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
19
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
20
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले

कोरोनात परीक्षा ऑफलाईन कशी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 00:00 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पालकांची चिंता वाढली आहे. ऑफलाईन परीक्षांदरम्यान शारीरिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळले जातील. परीक्षांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे गोसावी यांनी स्पष्ट केले. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्या ऑनलाईन घेण्यात येतील, अशा अफवा सोशल मीडियावर पसरत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये चिंता, दहावी-बारावीच्या केंद्रांवर होणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल महिन्यात इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये तूर्तास कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासंदर्भात सुरू असलेल्या अफवांवर पालक, विद्यार्थी, शिक्षकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पालकांची चिंता वाढली आहे. ऑफलाईन परीक्षांदरम्यान शारीरिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळले जातील. परीक्षांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे गोसावी यांनी स्पष्ट केले. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्या ऑनलाईन घेण्यात येतील, अशा अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. मात्र, यात कोणतेही तथ्य नसल्याची बाब शिक्षण मंडळाने स्पष्ट केली आहे.

दहावीतील पालकांच्या प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांच्या अकाऊंट, गणित यासारख्या विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अवघड होणार आहे. त्यामुळे परीक्षा पद्धत, गुण पद्धतीत मंडळाने बदल करण्याचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचा विचार व्हावा.- मीनाक्षी देशपांडे, पालक

विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव, विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय या साऱ्यांचा विचार करूनच नियोजन करायला हवे. कोरोना संसर्गाने सर्वांनाच मानसिक तणाव झेलावा लागत आहे. - रोशन चव्हाण, पालक

वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुलांसह आम्हीही प्रचंड तणावात आहोत. शाळा सुरू नसल्याने आपण इतराच्या तुलनेत कमी गुण मिळवू, अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय निवडायला हवा.- तेजस्विनी आखरे, पालक.

शिक्षण मंडळाने परीक्षांचे नियोजन करताना ५० टक्के शाळांकडे, ५० टक्के ऑफलाईन परीक्षा यांच्यामार्फत करायला हरकत नाही. यापेक्षा सहज, सोपा इतर पर्याय असेल, तर त्याचाही विचार तातडीने करायला हवा.- रवि शर्मा, पालक

ऑनलाईनने विद्यार्थ्यांचा ६० टक्केच अभ्यासक्रम झाला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वंकष विचार करून मंडळाने मूल्यमापनाची पद्धती अवलंबवायला हवी. याच अभ्यासाच्या आधारे मंडळाने प्रचलित पद्धतीचा हट्ट न धरता परीक्षेचे नियोजन करावे.- प्रीती डोंगरे, पालक

बारावीच्या परीक्षा ऑनलाईन हव्या. एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेतल्यास गुणांचे नियोजन अवघड होणार आहे, याची आम्हाला जाणीव आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याविषयी विचार करावा.- अर्चना उके, पालक

ऑनलाईन परीक्षांचा पर्याय असावापरीक्षा ऑनलाईन घ्यायला हव्या होत्या, असे मत ६८.३ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत केवळ २१ टक्के विद्यार्थ्यांनी ४० ते ५० टक्के स्वत:च अभ्यास केल्याचे कबूल केले आहे.  यंदा शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली आहे. या अभ्यासक्रम कपातीसंदर्भात ५१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. प्रचलित परीक्षेपेक्षा आराखडा बदलून ५० टक्के गुण बोर्डाने शाळेतील अंतर्गत मूल्यमापन, तर ५० टक्के लेखी परीक्षेस ठेवावे, असे पालकांचे मत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षा