शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

कोरोनात परीक्षा ऑफलाईन कशी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 00:00 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पालकांची चिंता वाढली आहे. ऑफलाईन परीक्षांदरम्यान शारीरिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळले जातील. परीक्षांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे गोसावी यांनी स्पष्ट केले. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्या ऑनलाईन घेण्यात येतील, अशा अफवा सोशल मीडियावर पसरत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये चिंता, दहावी-बारावीच्या केंद्रांवर होणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल महिन्यात इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये तूर्तास कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासंदर्भात सुरू असलेल्या अफवांवर पालक, विद्यार्थी, शिक्षकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पालकांची चिंता वाढली आहे. ऑफलाईन परीक्षांदरम्यान शारीरिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळले जातील. परीक्षांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे गोसावी यांनी स्पष्ट केले. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्या ऑनलाईन घेण्यात येतील, अशा अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. मात्र, यात कोणतेही तथ्य नसल्याची बाब शिक्षण मंडळाने स्पष्ट केली आहे.

दहावीतील पालकांच्या प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांच्या अकाऊंट, गणित यासारख्या विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अवघड होणार आहे. त्यामुळे परीक्षा पद्धत, गुण पद्धतीत मंडळाने बदल करण्याचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचा विचार व्हावा.- मीनाक्षी देशपांडे, पालक

विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव, विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय या साऱ्यांचा विचार करूनच नियोजन करायला हवे. कोरोना संसर्गाने सर्वांनाच मानसिक तणाव झेलावा लागत आहे. - रोशन चव्हाण, पालक

वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुलांसह आम्हीही प्रचंड तणावात आहोत. शाळा सुरू नसल्याने आपण इतराच्या तुलनेत कमी गुण मिळवू, अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय निवडायला हवा.- तेजस्विनी आखरे, पालक.

शिक्षण मंडळाने परीक्षांचे नियोजन करताना ५० टक्के शाळांकडे, ५० टक्के ऑफलाईन परीक्षा यांच्यामार्फत करायला हरकत नाही. यापेक्षा सहज, सोपा इतर पर्याय असेल, तर त्याचाही विचार तातडीने करायला हवा.- रवि शर्मा, पालक

ऑनलाईनने विद्यार्थ्यांचा ६० टक्केच अभ्यासक्रम झाला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वंकष विचार करून मंडळाने मूल्यमापनाची पद्धती अवलंबवायला हवी. याच अभ्यासाच्या आधारे मंडळाने प्रचलित पद्धतीचा हट्ट न धरता परीक्षेचे नियोजन करावे.- प्रीती डोंगरे, पालक

बारावीच्या परीक्षा ऑनलाईन हव्या. एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेतल्यास गुणांचे नियोजन अवघड होणार आहे, याची आम्हाला जाणीव आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याविषयी विचार करावा.- अर्चना उके, पालक

ऑनलाईन परीक्षांचा पर्याय असावापरीक्षा ऑनलाईन घ्यायला हव्या होत्या, असे मत ६८.३ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत केवळ २१ टक्के विद्यार्थ्यांनी ४० ते ५० टक्के स्वत:च अभ्यास केल्याचे कबूल केले आहे.  यंदा शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली आहे. या अभ्यासक्रम कपातीसंदर्भात ५१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. प्रचलित परीक्षेपेक्षा आराखडा बदलून ५० टक्के गुण बोर्डाने शाळेतील अंतर्गत मूल्यमापन, तर ५० टक्के लेखी परीक्षेस ठेवावे, असे पालकांचे मत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षा