शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सर्व सामान्यांची एसटी किती सुरक्षित? ४५० पैकी २८ बसचालकांकडून वर्षभरात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:22 IST

अमरावती : रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने घेतलेल्या आढाव्यात, जिल्ह्यात २०२० या वर्षभरात एसटी अपघाताच्या २८ घटना घडल्या. यापैकी १८ ...

अमरावती : रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने घेतलेल्या आढाव्यात, जिल्ह्यात २०२० या वर्षभरात एसटी अपघाताच्या २८ घटना घडल्या. यापैकी १८ अपघात किरकोळ, तर आठ गंभीर प्रकाराचे आहेत. दोन अत्यंत प्राणांतिक अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. तथापि, रस्त्यावर वाढलेली वाहने व बेफाम वाहतुकीच्या तुलनेच एसटीने प्रवास हाच सुरक्षित प्रवास असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

जिल्हाभरात ४५० बसचालक आहेत. गत वर्षभरात या ४५० पैकी २८ बसचालकांनी एसटीचे अपघात केले. दळणवळणाचे हे साधन सर्वसामान्यांच्या दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. हजारो प्रवाशांची या वाहनांतून दररोज गंतव्यस्थळी सुरक्षित ने-आण केली जाते. मात्र, काही वाहनचालक बस भरधाव चालवितात तसेच वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे अपघात घडतात. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान अमरावती जिल्ह्यात एसटी अपघाताच्या २८ घटना घडल्या. यामध्ये दोन प्राणांतिक अपघातांमध्ये तीन प्रवाशांचा जीव गेला. या अपघातांची चौकशी एसटीच्या विभाग नियंत्रकस्तरावर सुरू आहे. याशिवाय या प्रकरणांमध्ये चालकांचीही चौकशी होत आहे. यादरम्यान यंदा लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके सहा महिने ठप्प होती. यावेळी एसटीमधून मालवाहतूक करण्यात आली.त्यामुळे अपघाताचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत घटले आहे.

२०२० या वर्षभरात झालेले एसटीचे अपघात

जानेवारी - ४

फेब्रुवारी - ७

मार्च - ४

एप्रिल - ०

मे - ०

जून - ०

ऑगस्ट - १

सप्टेंबर - ०

ऑक्टोंबर - ५

नोव्हेंबर - ३

डिसेंबर - ४

१) जिल्ह्यात एसटी चालक -४५०

विना अपघात बस चालविली म्हणून सत्कार

१० वर्षापेक्षा जास्त सेवा - ०१

१५ वर्षापेेक्षा जास्त सेवा - ०३

बॉक्स : आहे.

७० ला एसटीचा स्पीड लॉक

तीन कोट आहेत.