शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधक किती सुरक्षित ?

By admin | Updated: February 23, 2016 00:04 IST

शहरातील वाहनांची गर्दी आणि वाढलेले अपघातांवर काही अंशी नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकाची निर्मिती केली जाते.

असुरक्षिततेची भावना : आयआरसीचे नियम पायदळी प्रदीप भाकरे अमरावतीशहरातील वाहनांची गर्दी आणि वाढलेले अपघातांवर काही अंशी नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकाची निर्मिती केली जाते. त्यामुळे ते अत्यावश्यक आहेत. पण, या गतिरोधकांमुळे नवीन संकट ओढवल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. परिणामी या गरजेच्या गतिरोधकांबाबत वाहन चालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारले जातात. त्यासाठी इंडियन रोड काँग्रेसचे नियम आणि निकषही आहेत. मात्र शहरातील गतिरोधकांची अवस्था पाहता नियमांची प्रतारणा करीत अनेक ठिकाणी फक्त मागणी आली म्हणून गतिरोधक उभारल्याचे दिसून येते. शहरातील गतिरोधक वाहनांची गती नियंत्रित ठेवण्यासाठी उभारलेत की ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्वावर त्यांची निर्मिती केली आहे. असा प्रश्न रस्त्यांवरील गतिरोधकांवरून जाताना पडतो.गतिरोधकाने आजार बळावलेअमरावती : शहरात उभारलेले गतिरोधक एक सारखे नाहीत. गतिरोधकांच्या नावाखाली काही ठिकाणी उभारलेल्या टेकांड्यामुळे नागरिकांची शारीरिक, तसेच वाहनांचीही क्षति होत आहे. यातून गतिरोधक उभारतांना यंत्रणा कोणत्या नियमाची अंमलबजावणी क रते, असाच प्रश्न निर्माण झाला आहे.पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी व वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारले जातात.मात्र प्रशासनाने इंडियन रोड कांग्रेसचे नियम व उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळेझाक करत अनेक ठिकाणी गतिरोधक उभारले जातत. पादचाऱ्यांना रस्ता ओलाडण्यासाठीच्या उंचवट्यांना शहरातील वाहनचालकांना समोरे जावे लागते. त्यावर पडलेले खड्डे व उखडल्ले पेव्हिंग बॉक्स यामुळे वाहन घसरण्याच्या घटनाही घहत आहेत. डांबराच्या पातळ पट्ट्या (रंबल्ड स्ट्रिप्स) वापरुन वाहतूक उंचावत जाणारा व शिखरावर सपाट असलेला ऊंचवटा तयार करुन गतिरोधकाची निर्मिती झाली पाहिजे. हा आयआरटींचा नियमही पासलेला दिसत नाही. परिणामी या गरजेच्या गतिरोधकांबद्दल वहन चालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक होईल स्मार्ट शहरातील अनेक मार्गासह महामार्गाचीही हीच परिस्थिती आहे.त्यामुळे अमरावती शहर स्मार्टसिटीचे नियोजन करतांना चांगले रस्ते हवेत. याबाबतचा निर्णय तज्ञांच्या सल्लयावरुन केल्यावरच झाला तर शहरातील वाहतूक स्मार्ट व सुरक्षित होईल. स्पीडब्रेकरमुळे नागरिकांना पाठीचा, मणक्याचा आजार बळावल्याची अनेक उदाहरणे आहेत. गतिरोधकांची ऊंची कमी-अधिक असल्यामुळे वाहनचालकांना अनेक प्रकारच्या आजाराला सामोरे जावे लागते. - प्रिया चौधरी,जनरल फिजियशन