शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

किती ही लूट? भाजी मंडईत कोबीफूल १५ तर घराजवळ ६० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:12 IST

मागणीच्या तुलनेत स्थानिक क्षेत्रातील उत्पादन कमी पडत असल्याने अमरावती बाजार समितीच्या भाजी मंडईत दूरदुरून भाजीपाला, फळे विक्रीला येतात. मात्र, ...

मागणीच्या तुलनेत स्थानिक क्षेत्रातील उत्पादन कमी पडत असल्याने अमरावती बाजार समितीच्या भाजी मंडईत दूरदुरून भाजीपाला, फळे विक्रीला येतात. मात्र, पावसामुळे कुठे दरड कोसळल्याने वा रस्ते खरडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन फेऱ्याने वाहने आणावी लागत असल्याने डिझेलचा वाढता खर्च पाहता चढ्या दराने भाजीपाला विकला जात असला तरी चिल्लर विक्रेते त्याच्या चौपट दराने विक्री करीत असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला खार लागत असल्याच्या प्रतिक्रिया गृहिणींकडून उमटू लागल्या आहेत.

बॉक्स

पिकवतात शेतकरी जास्तीचा पेसा तिसऱ्याच्या हातात

शेतकरी राबराब राबून उन्ह -वारा सहन करीत जिवाचा आटापिटा करून भाजीपाला पिकवितो. सायंकाळी तो भरून पहाटे मंडईत आणतो. उत्पादन खर्चासह वाहतूक खर्च पाहता त्याला तोकडे उत्पन्न मिळतो. मात्र, मंडईतून ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा मोबदला त्यापेक्षा अधिक विक्रेता मिळवतो.

-

एवढा फरक कसा?

भाजीपाला मंडईत येतो तेव्हा त्याची बोली लावतो दलाल. खरेदी करतो अडत्या आणि ग्राहकांपर्यंत पोहचवितो चिल्लर विक्रेता, अशी ही साखळी निर्माण झाली आहे. मात्र, शेतकरी वगळता सर्वांना भाव ठरविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मंडईत पोहचलेल्या मालाची विक्री आपला नफा पाहून हे विक्रेते ठरवित असल्याने दरात इतका फरक दिसून येतो, असे दलालांचे म्हणणे आहे.

-

रुक्मिणीनगर हिरवी मिरची ८० रुपये किलो

भाजी मंडईत २० रुपये किलो शेतकऱ्यांकडून खरेदी होत असलेली हिरवी मिरची रुक्मिणीनगरात तब्बल ८० रुपये प्रतिकिलो विकली जात असल्याचे किरकोळ भाजीपाला विक्रेता नामदेव बडगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

गृहिणींच्या प्रतिक्रिया

अर्धा किलो अन पावभर भाजीपाला खरेदीकरिता थेट भाजी मंडईत जाणे परवडत नसल्याने घराजवळ येणाऱ्या हातगाडीवर भाजीपाला खरेदी करावा लागतो. मात्र, चौपट भाव सांगण्यात येतात. नाइलाजाने तो खरेदी करावा लागतो.

- जयवंतीबाई आडे,

हमालपुरा

मंडईत येणाऱ्या भाजीपाल्याचे दर हे आवकनुसार दररोज बदलत असले तरी चिल्लर विक्रेता मात्र, चढ्या दरानेच विक्री करतात. इतके महाग म्हणताच, रोजच तर आपण भाजीपाला घेता. मग आजच का इतका महाग म्हणता, असे प्रत्युत्तरही देतात.

- मोनाली गुलालकरी

गांधीनगर

मंडईतून आणलेला भाजीपाला घरी साफ करावा लागतो. त्यातील खराब माल फेकावे लागतात. त्यामुळे ठोक दरात मिळालेल्या भावाने ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन विकल्यास आमची मजुरी निघेल का? घरखर्च चालेल एवढीच कमाई होत असल्याने आजही आहे त्याच स्थितीत जगत आहे.

- नामदेव बडगे,

भाजीविक्रेता

हा बघा दरातील फरक (प्रतिकिलो दर)

भाजीपाला ठोक दर चिल्लर दर

कांदा १८ ३०

बटाटा १४ ३०

लसूण ९० १६०

टोमॅटो २० ६०

वांगी १६ ४०

फूलकोबी २० ६०

पानकोबी २० ४०

पालक १५ ६०

मेथी ३५ ४०

कारले २२ ४०

बरबटी १५ ४०

ढेमसे २० ५०

सांभार ३० १२०

काकडी १५ ४०

बीट १८ ६०

हिरवी मिरची २५ ८०

सिमला मिरची २८ ४०

कोहळं १० ३०

भेंडी १५ ४०

गवार ३० ८०

गांजर २० ६०