शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

अभियांत्रिकीच्या पुनर्मूल्यांकनात गुणवाढ कशी?, विद्यापीठात डाटा एन्ट्रीचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 21:56 IST

विद्यापीठात डाटा एन्ट्री खासगी व्यक्तीकडून करण्यात येते.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ अभियांत्रिकी परीक्षेत अगोदर अनुत्तीर्ण मात्र, पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण हा घोळ कायम आहे. अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याला ७ गुणांचे पुनर्मूल्यांकनानंतर ५२ गुण दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठात ऑनलाइन कारभार रामभरोसे तर सुरू नाही ना, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

विद्यापीठात डाटा एन्ट्री खासगी व्यक्तीकडून करण्यात येते. त्यानुसार अभियांत्रिकी उन्हाळी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची डाटा एन्ट्री करण्यात आली आहे. मात्र, ते करताना आॅपरेटरकडून प्रचंड त्रुटी असल्याची बाब निदर्शनास आली आहे. उन्हाळी २०१९ अभियांत्रिकी परीक्षेत बहुतांश विद्यार्थ्यांना काही विषयात अनुत्तीर्ण गुणपत्रिका मिळाली. मात्र, तो विषय चांगला सोडविला असताना नापास कसे, या प्रश्नाने विद्यार्थी गोंधळात पडले.

परिणामी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी त्या विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला असता, तो गोपनीय विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार गोपनीय विभाग पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जाची चाचपणी करून त्या विषयाची उत्तरपत्रिका पाहते. खरेच त्या विद्यार्थ्याला कमी गुण असल्यास त्याचे पुनर्मूल्यांकन केले जाते, अन्यथा उत्तरपत्रिकेवर गुण जास्त असल्यास त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधून उत्तरपत्रिकेवर असलेले गुण अंकित करून मूळ गुणपत्रिका देण्याची विद्यापीठाची नियमावली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना होणारा त्रास, मनस्ताप, कुटुंबीयांची नाराजी, आर्थिक नुकसान आदी बाबीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकीचे २३ महाविद्यालये असून, जवळपास बहुतांश महाविद्यालयांत पुनर्मूल्यांकनानंतर गुणवाढ झाल्याचे वास्तव आहे. डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या चुकीमुळे उत्तरपत्रिकेवरील गुण कमी टाकण्यात येत असल्याने आॅनलाईन गुणपत्रिका पाठविली जाते, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.पुनर्मूल्यांकनाच्या शुल्काचे काय?विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करतात. त्याकरिता विद्यार्थ्यांना शुल्क मोजावे लागतात. त्यानंतरच पुनर्मूल्यांकन होते. मात्र, उत्तरपत्रिकेवर गुण अधिक असल्याचे निदर्शनास आल्यास पुनर्मूल्यांकन केले जात नाही. परंतु, विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी दिलेले शुल्क विद्यापीठ परत करते अथवा नाही, हा गंभीर विषय असल्याचे बोलले जात आहे. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्याला पुनर्मूल्यांकनाला सामोरे जावे लागत आहे, हे विशेष.विद्यापीठ कायद्यानुसार १९/२००१ च्या सुधारणेअंती पुनर्मूल्यांकनाच्या चाचपणीनंतर उत्तरपत्रिकेवर गुण वाढीव असल्यास नव्याने गुणपत्रिक  संचालकांना देता येते. आतापर्यंत अभियांत्रिकीच्या १५ विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका देण्यात आल्या आहेत.   - हेमंत देशमुख,   संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावती