शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या पुनर्मूल्यांकनात गुणवाढ कशी?, विद्यापीठात डाटा एन्ट्रीचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 21:56 IST

विद्यापीठात डाटा एन्ट्री खासगी व्यक्तीकडून करण्यात येते.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ अभियांत्रिकी परीक्षेत अगोदर अनुत्तीर्ण मात्र, पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण हा घोळ कायम आहे. अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याला ७ गुणांचे पुनर्मूल्यांकनानंतर ५२ गुण दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठात ऑनलाइन कारभार रामभरोसे तर सुरू नाही ना, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

विद्यापीठात डाटा एन्ट्री खासगी व्यक्तीकडून करण्यात येते. त्यानुसार अभियांत्रिकी उन्हाळी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची डाटा एन्ट्री करण्यात आली आहे. मात्र, ते करताना आॅपरेटरकडून प्रचंड त्रुटी असल्याची बाब निदर्शनास आली आहे. उन्हाळी २०१९ अभियांत्रिकी परीक्षेत बहुतांश विद्यार्थ्यांना काही विषयात अनुत्तीर्ण गुणपत्रिका मिळाली. मात्र, तो विषय चांगला सोडविला असताना नापास कसे, या प्रश्नाने विद्यार्थी गोंधळात पडले.

परिणामी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी त्या विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला असता, तो गोपनीय विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार गोपनीय विभाग पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जाची चाचपणी करून त्या विषयाची उत्तरपत्रिका पाहते. खरेच त्या विद्यार्थ्याला कमी गुण असल्यास त्याचे पुनर्मूल्यांकन केले जाते, अन्यथा उत्तरपत्रिकेवर गुण जास्त असल्यास त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधून उत्तरपत्रिकेवर असलेले गुण अंकित करून मूळ गुणपत्रिका देण्याची विद्यापीठाची नियमावली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना होणारा त्रास, मनस्ताप, कुटुंबीयांची नाराजी, आर्थिक नुकसान आदी बाबीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकीचे २३ महाविद्यालये असून, जवळपास बहुतांश महाविद्यालयांत पुनर्मूल्यांकनानंतर गुणवाढ झाल्याचे वास्तव आहे. डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या चुकीमुळे उत्तरपत्रिकेवरील गुण कमी टाकण्यात येत असल्याने आॅनलाईन गुणपत्रिका पाठविली जाते, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.पुनर्मूल्यांकनाच्या शुल्काचे काय?विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करतात. त्याकरिता विद्यार्थ्यांना शुल्क मोजावे लागतात. त्यानंतरच पुनर्मूल्यांकन होते. मात्र, उत्तरपत्रिकेवर गुण अधिक असल्याचे निदर्शनास आल्यास पुनर्मूल्यांकन केले जात नाही. परंतु, विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी दिलेले शुल्क विद्यापीठ परत करते अथवा नाही, हा गंभीर विषय असल्याचे बोलले जात आहे. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्याला पुनर्मूल्यांकनाला सामोरे जावे लागत आहे, हे विशेष.विद्यापीठ कायद्यानुसार १९/२००१ च्या सुधारणेअंती पुनर्मूल्यांकनाच्या चाचपणीनंतर उत्तरपत्रिकेवर गुण वाढीव असल्यास नव्याने गुणपत्रिक  संचालकांना देता येते. आतापर्यंत अभियांत्रिकीच्या १५ विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका देण्यात आल्या आहेत.   - हेमंत देशमुख,   संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावती