शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

प्रकल्प गाठताहेत तळ कसे वाहणार नळ ?

By admin | Updated: April 2, 2015 00:35 IST

शेतकऱ्यांसह अन्य घटकांना अस्वस्थ करणाऱ्या अवकाळी पावसाच्या कळा आणि गारपीट अलीकडे नित्याची बाब झाली असली ...

अमरावती : शेतकऱ्यांसह अन्य घटकांना अस्वस्थ करणाऱ्या अवकाळी पावसाच्या कळा आणि गारपीट अलीकडे नित्याची बाब झाली असली तरी अमरावती विभागात जलप्रकल्पातील जलसाठा निम्म्यापेक्षा कमी होत असल्याने उन्हाळा किती तीव्र असेल ते सांगत आहेत. विभाग तील ४४९ प्रकल्पांत आता केवळ ३२ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता वाढली आहे. सध्या २२ गावे वाड्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात तहानलेल्या गाव वाड्यांची संख्या वाढणार आहे. दुसरीकडे उपलब्ध साठ्यातून काळजीपूर्वक पाणी पुरवठयाचे प्रशासनापुढे आवाहन आहे. विभागातील अमरावती अकोला, वाशिम, यवतमाळ, आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळवून सुमारे ४४९ प्रकल्प आहेत. यामध्ये अमरावती विभागातील नऊ मोठया प्रकल्पांत ९४१.८२ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ३२.२८ इतकी आहे. अमरावती जिल्ह्यात एका मोठ्या प्रकल्पामंध्ये २०८.७१ या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठाच शिल्लक आहे. याची टक्केवारी ३७ एवढी आहे.अमरावती जिल्हयात मोठे, मध्यम व लघु असे एकूण ७६ प्रकल्प आहेत. यामध्ये मंगळवार पर्यत एकूण चार मध्यम प्रकल्पात १११.६९ द.ल.घ.मी पाणीसाठा आहे. याची टक्केवारी ६९.२६ एवढी आहे तर ७१ लघु प्रकल्पात एकृण ५५.६८ द.ल.घ.मी पाणी साठा शिल्लक आहे. जिल्हाभरातील सर्व लहान-मोठ्या प्रकल्पात एकूण ३७६ .०८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. याची टक्केवारी ४३.४२ आहे. अमरावती व विभागातील पाच जिल्ह्यातील प्रकल्पात आजघडीला ९४१.८२ एवढाच पाणी साठा शिल्लक असून याची टक्केवारी केवळ ३२.२८ एवढीच आहे. सध्या उन्हाळ्याला जेमतेम सुरूवात झाली असून मार्च महिना संपला आहे. तरीही उन्हाळ्यातील तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई ही येणाऱ्या काही दिवसात गंभीर होण्याची चिन्हे सध्याच्या प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची गळद छाया जिल्ह्यात पडणार हे निश्चित आहे. शहरासह जिल्हयातील अनेक गावांना जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. याशिवाय शेतीलाही सिंचन प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून दिले जाते. परंतु शेतीचा विषय सध्या सोडल्यास नागरिकांना प्रकल्पातून होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारेच प्रकल्प तळ गाठत असल्याने भविष्यात पाण्याचे नळ कसे वाहणार ही बाब सर्वासाठी चिंतेची ठरणार आहे. प्रकल्पातून केवळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला पाण्याचा पुरवठा होता. ग्रामिण भागातील बऱ्याच गावाना स्थानिक पाणी स्रोतमधून पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे. त्यामुळे विहीर व बोरवेल्सव्दारे पाणी पुरवठा होत असल्याने सध्या तरी पाणी टंचाईची समस्या नाही. ज्या ठिकाणी समस्या निर्माण झाली तर ती हाताळण्यास पाणी पुरवठा विभाग सज्ज आहे.संजय येवले उपअभियंता पाणी पुरवठा विभाग जि.प.प्रकल्पातील पाण्याचा साठा कमी होत असला तरी याचा संभाव्य परिणाम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला होऊ शकतो; मात्र तशी वेळ यणार नाही. ग्रामीण भागात सध्या बऱ्याच गावामध्ये स्वतंत्र पाणी पुरवठ्याचे सोर्स आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता फारशी भासणार नाहीआनंद दासवत उपअभियंता पाणी पुरवठा विभाग, अमरावती