शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रकल्प गाठताहेत तळ कसे वाहणार नळ ?

By admin | Updated: April 2, 2015 00:35 IST

शेतकऱ्यांसह अन्य घटकांना अस्वस्थ करणाऱ्या अवकाळी पावसाच्या कळा आणि गारपीट अलीकडे नित्याची बाब झाली असली ...

अमरावती : शेतकऱ्यांसह अन्य घटकांना अस्वस्थ करणाऱ्या अवकाळी पावसाच्या कळा आणि गारपीट अलीकडे नित्याची बाब झाली असली तरी अमरावती विभागात जलप्रकल्पातील जलसाठा निम्म्यापेक्षा कमी होत असल्याने उन्हाळा किती तीव्र असेल ते सांगत आहेत. विभाग तील ४४९ प्रकल्पांत आता केवळ ३२ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता वाढली आहे. सध्या २२ गावे वाड्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात तहानलेल्या गाव वाड्यांची संख्या वाढणार आहे. दुसरीकडे उपलब्ध साठ्यातून काळजीपूर्वक पाणी पुरवठयाचे प्रशासनापुढे आवाहन आहे. विभागातील अमरावती अकोला, वाशिम, यवतमाळ, आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळवून सुमारे ४४९ प्रकल्प आहेत. यामध्ये अमरावती विभागातील नऊ मोठया प्रकल्पांत ९४१.८२ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ३२.२८ इतकी आहे. अमरावती जिल्ह्यात एका मोठ्या प्रकल्पामंध्ये २०८.७१ या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठाच शिल्लक आहे. याची टक्केवारी ३७ एवढी आहे.अमरावती जिल्हयात मोठे, मध्यम व लघु असे एकूण ७६ प्रकल्प आहेत. यामध्ये मंगळवार पर्यत एकूण चार मध्यम प्रकल्पात १११.६९ द.ल.घ.मी पाणीसाठा आहे. याची टक्केवारी ६९.२६ एवढी आहे तर ७१ लघु प्रकल्पात एकृण ५५.६८ द.ल.घ.मी पाणी साठा शिल्लक आहे. जिल्हाभरातील सर्व लहान-मोठ्या प्रकल्पात एकूण ३७६ .०८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. याची टक्केवारी ४३.४२ आहे. अमरावती व विभागातील पाच जिल्ह्यातील प्रकल्पात आजघडीला ९४१.८२ एवढाच पाणी साठा शिल्लक असून याची टक्केवारी केवळ ३२.२८ एवढीच आहे. सध्या उन्हाळ्याला जेमतेम सुरूवात झाली असून मार्च महिना संपला आहे. तरीही उन्हाळ्यातील तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई ही येणाऱ्या काही दिवसात गंभीर होण्याची चिन्हे सध्याच्या प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची गळद छाया जिल्ह्यात पडणार हे निश्चित आहे. शहरासह जिल्हयातील अनेक गावांना जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. याशिवाय शेतीलाही सिंचन प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून दिले जाते. परंतु शेतीचा विषय सध्या सोडल्यास नागरिकांना प्रकल्पातून होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारेच प्रकल्प तळ गाठत असल्याने भविष्यात पाण्याचे नळ कसे वाहणार ही बाब सर्वासाठी चिंतेची ठरणार आहे. प्रकल्पातून केवळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला पाण्याचा पुरवठा होता. ग्रामिण भागातील बऱ्याच गावाना स्थानिक पाणी स्रोतमधून पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे. त्यामुळे विहीर व बोरवेल्सव्दारे पाणी पुरवठा होत असल्याने सध्या तरी पाणी टंचाईची समस्या नाही. ज्या ठिकाणी समस्या निर्माण झाली तर ती हाताळण्यास पाणी पुरवठा विभाग सज्ज आहे.संजय येवले उपअभियंता पाणी पुरवठा विभाग जि.प.प्रकल्पातील पाण्याचा साठा कमी होत असला तरी याचा संभाव्य परिणाम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला होऊ शकतो; मात्र तशी वेळ यणार नाही. ग्रामीण भागात सध्या बऱ्याच गावामध्ये स्वतंत्र पाणी पुरवठ्याचे सोर्स आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता फारशी भासणार नाहीआनंद दासवत उपअभियंता पाणी पुरवठा विभाग, अमरावती