शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

गैरहजर भावेश आवारात पडला कसा?

By admin | Updated: August 31, 2016 00:08 IST

शहरापासून शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर येथील गोविंद गुरुकुल आश्रमशाळेत भावेश माकोडे हा इयत्ता तिसरीत शिकतो.

गोविंद गुरुकुल आश्रम शाळाप्रकरण : समाजकल्याण अधिकारी झोपेतसुमित हरकुट चांदूरबाजारशहरापासून शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर येथील गोविंद गुरुकुल आश्रमशाळेत भावेश माकोडे हा इयत्ता तिसरीत शिकतो. २४ आॅगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजतादरम्यान तो वसतिगृहात वरच्या मजल्यावरून खाली कोसळला. मात्र ही दुर्घटना घडली त्याच दिवशी वसतिगृहाच्या हजेरी पुस्तिकेत भावेश गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले आहे. तो गैरहजर असताना वसतिगृहाच्या आवारात ही दुर्घटना घडली कशी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. भावेश हा विद्यार्थी खाटीक समाजाचा रिद्धपूर याच गावातील रहिवासी असून त्याला वसतिगृहातील निवासी विद्यार्थी दाखविण्यात आले आहे. वसतिगृहाच्या हजेरी पुस्तकानुसार त्याचा अनुक्रमांक वर्ग तिसरीमधील ५० वर त्याच्या नावाची नोंदही आहे. नियमानुसार स्थानिक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देता येत नाही. विशेष बाब अशी की, वसतिगृहाच्या हजेरी पटावर मागील संपूर्ण दिवस वसतिगृहात उपस्थित असणाऱ्या भावेशला घटनेच्या दिवशी शाळेत हजर असतानाही वसतिगृहामध्ये गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले आहे. २४ आॅगस्टला उपस्थितीच्या रकाण्यात त्याच्या नावापुढे कोणतीच नोंद घेण्यात आली नाही. असे का करण्यात आले, याचे उत्तर शाळा प्रशासन देऊ शकले नाही. या घटनेनंतर संबंधित वसतिगृहाचा हजेरी पटाचे २६ आॅगस्टच्या सायंकाळी अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, २५ व २६ आॅगस्ट या दोन दिवसांच्या वसतिगृहातील उपस्थित विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या नव्हत्या. या नोंदी का घेण्यात आल्या नाहीत हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. या वसतिगृहात एकूण १२० विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण महिनाभर १२० विद्यार्थी उपस्थित असल्याचे दाखविण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी ३० विद्यार्थी अनुपस्थित दाखविण्यात आले. परंतु सलग तीनदिवस वसतिगृहाची पाहणी केली असता प्रत्यक्ष ५० ते ५५ विद्यार्थी वसतिगृहात उपस्थित असल्याचे आढळून आले आहेत.याविषयी संबंधितांकडून माहिती घेतली असता विद्यार्थी राखी पौर्णिमेनिमित्त गावाला गेली असल्याचे सांगण्यात आले. सलग आठ दिवस विद्यार्थी गैरहजर असतानासुद्धा हजेरीपटावर १२० विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखविण्यात आली आहे. मग घटनेच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थी गैरहजर कसे? ही किमया शाळेच्या कर्तबगार मुख्याध्यापकांनी केली असावी, असा अंदाज नागरिकांकडून वर्तविली जात आहे.समाजकल्याण अधिकारी केव्हा देणार भेट ?या आश्रमशाळेत इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही समाजकल्याण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची घटना माहिती असूनही वसतिगृहाला साधी भेटही दिली नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर २६ आॅगस्ट रोजी येणारे समाजकल्याण अधिकारी आजवर वसतिगृहापर्यंत पोहोचू शकले नाहीत, यामागील खरे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांची पडताळणी आवश्यकगोविंद गुरुकुल आश्रमशाळेतील १२० निवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची जातीनिहाय प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावरून चौकशी होणे गरजेचे आहे. या वसतिगृहाला व्हीजेएनटीची मान्यता प्राप्त असताना या विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्यात आला आहे काय, याची प्रामाणिक चौकशी झाल्यास या आश्रमशाळेतील प्रवेश व देण्यात येणाऱ्या सुविधा उघडकीस येईल, हे मात्र निश्चित.