शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचा जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:51 IST

राज्यात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग विविध संकटांचा सामना करीत आहेत. खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यांसह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी संभाजी ब्रिगेडने जिल्हा कचेरीसमोर घंटानाद करीत शासनाचे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग विविध संकटांचा सामना करीत आहेत. खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यांसह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी संभाजी ब्रिगेडने जिल्हा कचेरीसमोर घंटानाद करीत शासनाचे लक्ष वेधले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.पेरणीसाठी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रूपये देण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी अंतर्गत कपात केलेली शेतकºयांची २५ टक्के रक्कम परत देण्यात यावी, रासायनिक खताची भाववाढ मागे घेण्यात यावी, खते, बी- बियाणे, कीटकनाशक कंपन्याचे राष्ट्रीयीकरण करावे, कृषिकर्जाचे सध्याचे निकष बदलून एकरी ५० हजार कर्ज द्यावे, शेती व्यवसायाला उद्योगाचा व संवैधानिक दर्जा देण्यात यावा, शेतकºयांचे २०१४ पर्यंतचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, शेतीची कामे मनरेगा अंतर्गत समाविष्ट करावे, शेतकरीविरोधी कायदा रद्द करून भाव संरक्षण कायदा करण्यात यावा, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित व वेतन आयोगाचे धर्तीवर हमी भाव देण्यात यावा, कृषिपंप धारकांना विद्युत जोडणी तात्काळ देण्यात यावी व ती ऐच्छिक असावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे डॉ. अभय गावंडे, जिल्हाध्यक्ष रणजित तिडके, संजय ठाकरे, अंकुश साठे, शरद काळे, कुशल देशमुख, हर्षदीप चावके, शुभम शेरकर, दीपक लोखंडे, अजित काळबांडे, गजानन मानकर आदी सहभागी होते. 

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड