शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

फलोत्पादन योजनेच्या अनुदान वाटपात घोळ

By admin | Updated: June 12, 2014 23:41 IST

राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत पीक सरंक्षण उपकरणाकरिता शेतकऱ्यांना काही ठिकाणी ५० टक्के तर काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे योजनेचे नेमके अनुदान किती?

वरुड : राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत पीक सरंक्षण उपकरणाकरिता शेतकऱ्यांना काही ठिकाणी ५० टक्के तर काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे योजनेचे नेमके अनुदान किती? हा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून फलोत्पादन यांत्रिकीकरण योजनेतील अनुदानात घोळ असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. शेती कामामध्ये मजुरांची कमी होणारी संख्या, मजुरीवरील खर्च यामुळे मशागतीची कामे वेळेवर होत नाहीत. पिकांचा उत्पादन खर्च वाढतो, यामुळे फलोत्पादन क्षेत्रामध्ये यंत्राचा वापर अनिवार्य झाला. या बाबी विचारात घेऊन शेतकऱ्यांना, उत्पादक संघ व सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अवजारे, उपकरणे, सयंत्रे, अनुदानावर उपलब्ध करुन देण्यासाठी फलोत्पादन यांत्रिकीकरण हा घटक राबविण्यात येत आहे. शेतीची कामे वेळेवर होण्याकरिता शेतीच्या यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, फलोत्पादन पिकांच्या उत्पादकता खर्चात बचत करणे यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत पीक संरक्षण उपकरणाच्या खरेदीवर कमीत कमी ५० टक्के व अधिकाधिक १७ हजार ५०० रुपये मर्यादेत अनुदान देण्याची योजना २०१०-११ पासूून लागू करण्यात आली. जिल्हा कृषी अधीक्षक या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी आहेत. २०१०-११ या वर्षापासून ही योजना सुरु झाली आहे. सन २०१३-१४ या वर्षात वरुड तालुक्यातील २९ लाभार्थी शेतकऱ्यांना ५० टक्के तर काही शेतकऱ्यांना ५० टक्के पेक्षाही कमी अनुदानाचे धनादेश देण्यात आले. मोर्शी तालुक्यातील लेहेगाव येथील शेतकरी अरविंद तट्टे यांनी २३ हजार १०० रुपयांचा शोल्डर पंप खरेदी केला. त्यांना ५० टक्के अनुदानाची रक्कम ११,५०० रुपये मिळणे आवश्यक होते. परंतु जिल्हा कृषी अधीक्षकांनी अरविंद तट्टे यांच्या नावाने ७ हजार ८५० रुपयांचा धनादेश काढला. शेवटी तट्टे यांनी धनादेश जिल्हा कृषी अधीक्षकांना परत दिला. वरुड तालुक्यात शोल्डर पॉवर स्प्रेअरकरिता ११ लाभार्थ्यांना प्रत्येकी ७ हजार ८५० रुपये असे एकूण ८६ हजार ३५० रुपयांचे अनुदान वाटप, ब्रशकटर खरेदी करणाऱ्या ६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ७ हजार २४५ रुपये असे एकूण ४३ हजार ४७० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. एचटीपी पंप १२ लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आले असून प्रत्येकी ९ हजार ७०० रुपये असे एकूण १ लाख १६ हजार ४०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. हे अनुदान ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.