शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पीक पंचनाम्यांबाबत शासनाचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:50 IST

यावर्षी जिल्ह्यात धान पिकावर आलेल्या मावा, तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पीक हातचे जाऊन शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र आता संपूर्ण शेतातील पीक कापणी झाल्यानंतर शासनाने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देकापणीनंतर आला आदेश : महसूल विभागापुढे पेच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात धान पिकावर आलेल्या मावा, तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पीक हातचे जाऊन शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र आता संपूर्ण शेतातील पीक कापणी झाल्यानंतर शासनाने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. वरातीमागून घोडे चालविण्याच्या या प्रकाराने संबंधित यंत्रणाही चक्रावून गेली आहे. या सर्व्हेक्षणाचा शेतकºयांना लाभ होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.यावर्षी खरीप हंगामात धानासोबत कापसावरही मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षेपेक्षा बरेच कमी उत्पन्न होत आहे. याबाबत स्थानिक आमदारांसह खासदारांनीही पीकांचे पंचनामे, सर्व्हेक्षण करण्याची विनंती शासनाकडे केली होती. पण प्रत्यक्षात वरिष्ठांकडून निर्देश आल्याशिवाय जिल्हास्तरावर प्रशासनाने हालचाल केली नाही. दि.५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पीक बाधित शेतकºयांना मदत देण्यासाठी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकाºयांना पाठविल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी ८ डिसेंबरला सर्व तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. या पंचनाम्यांमध्ये ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान असणाºया शेतकºयांना मदतीस पात्र ठरविले जाणार आहे. मात्र आता शेतात पिकच नाही तर पंचनामे काय करणार? असा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.