शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मान, वेतनाची चौकशी

By admin | Updated: June 26, 2017 00:08 IST

स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना निवृत्तीवेतन दिले जाते. मात्र, काही लोक बनावट कागदपत्रांच्या आधारे सन्मान, निवृत्तीवेतन व इतर सवलतींचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी....

समिती गठित : आरडीसींकडे जबाबदारीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना निवृत्तीवेतन दिले जाते. मात्र, काही लोक बनावट कागदपत्रांच्या आधारे सन्मान, निवृत्तीवेतन व इतर सवलतींचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी राज्य शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने अशा बोगस स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची चौकशी होणार असून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.१५ आॅगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या व्यक्तिंना केंद्र व राज्य शासनातर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. यापैकी काहींना केंद्र व राज्य सरकारद्वारे निवृत्ती वेतनही लागू करण्यात आले आहे. परंतु यापैकी काही लोक बोगस दस्तऐवज सादर करून सन्मान, निवृत्तीवेतन व इतर सवलतींचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. याबाबतच्या तक्रारी खुद्द स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या विविध संघटनांनी राज्य शासनाकडे केल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी ज्यांचा दूरान्वयेही संबंध नाही, अशा महाभागांनी बनावट दस्तऐवज सादर करून स्वातंत्र्य संग्राम सैनिकाची उपाधी मिळवून घेतल्याची गंभीर तक्रार शासनाकडे प्राप्त झाली आहे. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार गांभीर्याने घेतली असून राज्यात सर्व महसूली विभागस्तरावर समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासमितीच्या कार्यकक्षा ठरवून देण्यात आल्या आहेत. प्राप्त तक्रारींच्या आधारे गठित समिती यासंदर्भात चौकशी करून तसा स्वयंस्पष्ट अहवाल शासनाकडे सादर करणार आहे. २० एप्रिल २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये यासमितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. चौकशी समितीच्या पुर्नरचनेत निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून कामकाज हाताळतील, असे सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव हनुमंत रसाळ यांनी शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले आहे. यानंतर या बोगस स्वातंत्र्य संग्राम सैनिकांवर आळा बसणार असून शासनाची केली जाणारी फसवणूक देखील टळणार आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सन्मान, वेतन मिळविल्याबाबतच्या स्वातंत्र्य सैनिकांसंबंधी प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्याकरिता चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून स्वयंस्पष्ट अहवाल शासनाकडे सादर केला जाईल.- अभिजित बांगरजिल्हाधिकारी, अमरावती.