शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मान, वेतनाची चौकशी

By admin | Updated: June 26, 2017 00:08 IST

स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना निवृत्तीवेतन दिले जाते. मात्र, काही लोक बनावट कागदपत्रांच्या आधारे सन्मान, निवृत्तीवेतन व इतर सवलतींचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी....

समिती गठित : आरडीसींकडे जबाबदारीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना निवृत्तीवेतन दिले जाते. मात्र, काही लोक बनावट कागदपत्रांच्या आधारे सन्मान, निवृत्तीवेतन व इतर सवलतींचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी राज्य शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने अशा बोगस स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची चौकशी होणार असून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.१५ आॅगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या व्यक्तिंना केंद्र व राज्य शासनातर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. यापैकी काहींना केंद्र व राज्य सरकारद्वारे निवृत्ती वेतनही लागू करण्यात आले आहे. परंतु यापैकी काही लोक बोगस दस्तऐवज सादर करून सन्मान, निवृत्तीवेतन व इतर सवलतींचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. याबाबतच्या तक्रारी खुद्द स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या विविध संघटनांनी राज्य शासनाकडे केल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी ज्यांचा दूरान्वयेही संबंध नाही, अशा महाभागांनी बनावट दस्तऐवज सादर करून स्वातंत्र्य संग्राम सैनिकाची उपाधी मिळवून घेतल्याची गंभीर तक्रार शासनाकडे प्राप्त झाली आहे. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार गांभीर्याने घेतली असून राज्यात सर्व महसूली विभागस्तरावर समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासमितीच्या कार्यकक्षा ठरवून देण्यात आल्या आहेत. प्राप्त तक्रारींच्या आधारे गठित समिती यासंदर्भात चौकशी करून तसा स्वयंस्पष्ट अहवाल शासनाकडे सादर करणार आहे. २० एप्रिल २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये यासमितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. चौकशी समितीच्या पुर्नरचनेत निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून कामकाज हाताळतील, असे सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव हनुमंत रसाळ यांनी शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले आहे. यानंतर या बोगस स्वातंत्र्य संग्राम सैनिकांवर आळा बसणार असून शासनाची केली जाणारी फसवणूक देखील टळणार आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सन्मान, वेतन मिळविल्याबाबतच्या स्वातंत्र्य सैनिकांसंबंधी प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्याकरिता चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून स्वयंस्पष्ट अहवाल शासनाकडे सादर केला जाईल.- अभिजित बांगरजिल्हाधिकारी, अमरावती.