शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

प्रामाणिक कामाचे समाधान वेगळेच

By admin | Updated: January 24, 2015 22:46 IST

शेतकऱ्यांना जीवन जगताना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यातुलनेत आपले जीवन अत्यंत सुुखदायी आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांसाठी प्रामाणिक काम केल्याचे समाधान काही वेगळेच असते,

पोटे यांचे प्रतिपादन : ४२ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटनअमरावती : शेतकऱ्यांना जीवन जगताना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यातुलनेत आपले जीवन अत्यंत सुुखदायी आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांसाठी प्रामाणिक काम केल्याचे समाधान काही वेगळेच असते, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी अधिवेशनादरम्यान केले. सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोशियनच्यावतीने शनिवारी संत सांस्कृतिक भवनातील आयोजित ४२ वे वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दर्यापूरचे आ. रमेश बुंदिले, मुख्य अंभियता संजय ताकसांडे, महापौर चरणजीत कौर नंदा, ए.आय.पी.ई.एफ.चे अध्यक्ष शैलेंद्र दुबे, रत्नाकर राव, रामेश्वर माहुरे, सुनील जगताप, सुनील देशमुख, विलास पवार, गजानन गोदे, उज्ज्वल गावंडे, साईश खारकर, राजाराम शितोंळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. विश्वश्वरय्या यांच्या प्रतीमेला हारार्पण करुन दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. उद्घाटनादरम्यान ना. पोटे भावूक झाले होते. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत त्यांनी अंभियत्यांना प्रामाणिक काम करण्याचा सल्ला दिला. आपण आपल्या घरी विद्युत जोडणी घेतल्यावर सर्व प्रकारची काळजी घेतो, त्या प्रमाणे महावितरणाच्या माध्यमातून नागरिकांनाही प्रामाणिक सेवा पुरविली पाहिजे, त्या कामाचे समाधान वेगळेच असते, असे पोटे म्हणाले. संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर माहुरे यांनी ईन्फ्रा-२ योजनेबद्दल माहिती देताना सांगितले की, ईन्फ्रा-२ योजनेतील कामे लवकरात लवकर केल्यास ओव्हरलोडींगचा प्रश्न निकाली निघून ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण कमी होईल व शेतकऱ्यांना योग्यरितीने वीज पुरवठा मिळण्यास सोपे जाईल. महावितरण कंपनीने स्वतचे डिझाईननुसार विजेचे मिटर घेतल्यास वीज चोरीवरही नियंत्रण मिळू शकेल. महापौर रिना नंदा यांनीही आपल्या भाषणातून विद्युत महावितरणाच्या कामांचे कौतूक करुन त्यांना योग्य सेवा पुरविण्याची विनंती केली. आ. रमेश बुंदिले यांनी शेतकऱ्यांना २४ तास वीज कशी देता येईल याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्तविक गजानन गोदे, संचालन क्षिप्रा मानकर तर आभार उज्ज्वल गावंडे यांनी केले. यावेळी राजेंद्र ठाकरे, देवीदास तिडके, बिपीन श्रीराव, यांच्यासह महाराष्टभरातील हजारो अंभियते उपस्थित होते. (प्रतिनिधी)