शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

प्रामाणिक कामाचे समाधान वेगळेच

By admin | Updated: January 24, 2015 22:46 IST

शेतकऱ्यांना जीवन जगताना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यातुलनेत आपले जीवन अत्यंत सुुखदायी आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांसाठी प्रामाणिक काम केल्याचे समाधान काही वेगळेच असते,

पोटे यांचे प्रतिपादन : ४२ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटनअमरावती : शेतकऱ्यांना जीवन जगताना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यातुलनेत आपले जीवन अत्यंत सुुखदायी आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांसाठी प्रामाणिक काम केल्याचे समाधान काही वेगळेच असते, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी अधिवेशनादरम्यान केले. सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोशियनच्यावतीने शनिवारी संत सांस्कृतिक भवनातील आयोजित ४२ वे वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दर्यापूरचे आ. रमेश बुंदिले, मुख्य अंभियता संजय ताकसांडे, महापौर चरणजीत कौर नंदा, ए.आय.पी.ई.एफ.चे अध्यक्ष शैलेंद्र दुबे, रत्नाकर राव, रामेश्वर माहुरे, सुनील जगताप, सुनील देशमुख, विलास पवार, गजानन गोदे, उज्ज्वल गावंडे, साईश खारकर, राजाराम शितोंळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. विश्वश्वरय्या यांच्या प्रतीमेला हारार्पण करुन दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. उद्घाटनादरम्यान ना. पोटे भावूक झाले होते. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत त्यांनी अंभियत्यांना प्रामाणिक काम करण्याचा सल्ला दिला. आपण आपल्या घरी विद्युत जोडणी घेतल्यावर सर्व प्रकारची काळजी घेतो, त्या प्रमाणे महावितरणाच्या माध्यमातून नागरिकांनाही प्रामाणिक सेवा पुरविली पाहिजे, त्या कामाचे समाधान वेगळेच असते, असे पोटे म्हणाले. संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर माहुरे यांनी ईन्फ्रा-२ योजनेबद्दल माहिती देताना सांगितले की, ईन्फ्रा-२ योजनेतील कामे लवकरात लवकर केल्यास ओव्हरलोडींगचा प्रश्न निकाली निघून ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण कमी होईल व शेतकऱ्यांना योग्यरितीने वीज पुरवठा मिळण्यास सोपे जाईल. महावितरण कंपनीने स्वतचे डिझाईननुसार विजेचे मिटर घेतल्यास वीज चोरीवरही नियंत्रण मिळू शकेल. महापौर रिना नंदा यांनीही आपल्या भाषणातून विद्युत महावितरणाच्या कामांचे कौतूक करुन त्यांना योग्य सेवा पुरविण्याची विनंती केली. आ. रमेश बुंदिले यांनी शेतकऱ्यांना २४ तास वीज कशी देता येईल याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्तविक गजानन गोदे, संचालन क्षिप्रा मानकर तर आभार उज्ज्वल गावंडे यांनी केले. यावेळी राजेंद्र ठाकरे, देवीदास तिडके, बिपीन श्रीराव, यांच्यासह महाराष्टभरातील हजारो अंभियते उपस्थित होते. (प्रतिनिधी)