शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफ ीच्या अध्यादेशाची होळी

By admin | Updated: June 22, 2017 00:03 IST

कर्जमाफीला तत्वत: व निकषांच्या आधारे मान्यता, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

काँग्रेसचे आंदोलन : चांदूरबाजार, तिवसा, अंजनगाव व दर्यापुरात कार्यकर्ते एकवटले अमरावती : कर्जमाफीला तत्वत: व निकषांच्या आधारे मान्यता, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसा अध्यादेश शासनाने काढला आहे. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून सरकारने कर्जमाफ ीचा केवळ ‘फ ार्स’ चालविल्याचा आरोप करीत काँग्रेसने तिवसा, चांदूरबाजार, दर्यापूर व अंजनगावात बुधवारी आंदोलन केले. कर्जमाफीचा जीआर जाळून शासन निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. तिवसा : तालुका काँग्रेसच्यावतीने तहसील प्रशासकीय इमारत परिसरात आंदोलन करून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. भाजप शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शासनविरोधी घोषणा दिल्यात. बँकेने अद्याप शेतकऱ्यांना पीककर्ज दिलेले नाही. सुकाणू समितीच्या बैठकी सुरूच आहेत. शेतकरी संप थांबावा, यासाठी केवळ घोषणाबाजी केली जात असल्याचा आरोप यावेळी केला. तिवसा येथे नाफेडमार्फत अनेक शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले असून तूर खरेदी झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत, असा आरोपही करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मुकुंद देशमुख, दिलीप काळबांडे, वैभव वानखडे, सागर राऊत, रामदास मेहत्रे, नरेंद्र विघ्ने, दीपक पावडे, उपस्थित होते.चांदूरबाजार : येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शासनाने कर्जमाफी व तत्काळ दहा हजार रूपये देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयातील अटी व निकषांमुळे सर्वसाधारण व गरीब शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासननिर्णयाचा विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली. सोबतच एक निषेध निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती अरविंद लंगोटे, शिवाजी बंड, किशोर देशमुख, बाबूभाई इनामदार, बाबूराव जवंजाळ, छोटू देशमुख, विलास गांजरे, भय्या काळे, विशाल बेले, प्रवीण वाघमारे, नंदू भोयर,संजय म्हाला, प्रमोद घुलक्षे नजीम बेग, भाई देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.दर्यापूर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अमोल कुंभार यांना शासनाच्या अध्यादेशाचे निवेदन देत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, अभिजीत देवके, सुनील गावंडे बबनराव देशमुख, शशांक धर्माळे, साहेबराव बदे, राजिकभाई, राजू वानखडे, अविनाश ठाकरे, केशव भडांगे, दिलीप चव्हाण उपस्थित होते.अंजनगाव सुर्जी : येथील तहसील कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष राजेंद्र आडे यांच्या नेतृत्वात शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. हरिभाऊ बहिरे, सत्यविजय निपाने, हिम्मत ढोक, विनोद देशमुख, मुरलीधर तुरखडे, सुभाष चौखंडे, ज्ञानेश्वर मुरतकर, दिलीप देशमुख, रवि बोंदरे, फरहाज भाई, एकनाथ निचळ, नितीन निमकाळे, प्रफु ल्ल ढोक, दीपक हरणे, राहुल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.