शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

कर्जमाफ ीच्या अध्यादेशाची होळी

By admin | Updated: June 22, 2017 00:03 IST

कर्जमाफीला तत्वत: व निकषांच्या आधारे मान्यता, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

काँग्रेसचे आंदोलन : चांदूरबाजार, तिवसा, अंजनगाव व दर्यापुरात कार्यकर्ते एकवटले अमरावती : कर्जमाफीला तत्वत: व निकषांच्या आधारे मान्यता, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसा अध्यादेश शासनाने काढला आहे. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून सरकारने कर्जमाफ ीचा केवळ ‘फ ार्स’ चालविल्याचा आरोप करीत काँग्रेसने तिवसा, चांदूरबाजार, दर्यापूर व अंजनगावात बुधवारी आंदोलन केले. कर्जमाफीचा जीआर जाळून शासन निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. तिवसा : तालुका काँग्रेसच्यावतीने तहसील प्रशासकीय इमारत परिसरात आंदोलन करून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. भाजप शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शासनविरोधी घोषणा दिल्यात. बँकेने अद्याप शेतकऱ्यांना पीककर्ज दिलेले नाही. सुकाणू समितीच्या बैठकी सुरूच आहेत. शेतकरी संप थांबावा, यासाठी केवळ घोषणाबाजी केली जात असल्याचा आरोप यावेळी केला. तिवसा येथे नाफेडमार्फत अनेक शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले असून तूर खरेदी झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत, असा आरोपही करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मुकुंद देशमुख, दिलीप काळबांडे, वैभव वानखडे, सागर राऊत, रामदास मेहत्रे, नरेंद्र विघ्ने, दीपक पावडे, उपस्थित होते.चांदूरबाजार : येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शासनाने कर्जमाफी व तत्काळ दहा हजार रूपये देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयातील अटी व निकषांमुळे सर्वसाधारण व गरीब शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासननिर्णयाचा विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली. सोबतच एक निषेध निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती अरविंद लंगोटे, शिवाजी बंड, किशोर देशमुख, बाबूभाई इनामदार, बाबूराव जवंजाळ, छोटू देशमुख, विलास गांजरे, भय्या काळे, विशाल बेले, प्रवीण वाघमारे, नंदू भोयर,संजय म्हाला, प्रमोद घुलक्षे नजीम बेग, भाई देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.दर्यापूर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अमोल कुंभार यांना शासनाच्या अध्यादेशाचे निवेदन देत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, अभिजीत देवके, सुनील गावंडे बबनराव देशमुख, शशांक धर्माळे, साहेबराव बदे, राजिकभाई, राजू वानखडे, अविनाश ठाकरे, केशव भडांगे, दिलीप चव्हाण उपस्थित होते.अंजनगाव सुर्जी : येथील तहसील कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष राजेंद्र आडे यांच्या नेतृत्वात शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. हरिभाऊ बहिरे, सत्यविजय निपाने, हिम्मत ढोक, विनोद देशमुख, मुरलीधर तुरखडे, सुभाष चौखंडे, ज्ञानेश्वर मुरतकर, दिलीप देशमुख, रवि बोंदरे, फरहाज भाई, एकनाथ निचळ, नितीन निमकाळे, प्रफु ल्ल ढोक, दीपक हरणे, राहुल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.