शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शंभर वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक विहिरी कोरड्या ठण्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:08 IST

परकोटाच्या आतील बुधवारा परिसरातील शंभर वर्षांपूर्वीच्या बहुतांश ऐतिहासिक विहिरी आटल्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. विहिरींतील गाळ काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला.

ठळक मुद्देरहिवासी त्रस्त : बुधवारा परिसरात पाणीटंचाईचे सावट

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परकोटाच्या आतील बुधवारा परिसरातील शंभर वर्षांपूर्वीच्या बहुतांश ऐतिहासिक विहिरी आटल्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. विहिरींतील गाळ काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रथमच नागरिकांना पाणीटंचाईची झळ पोहचली आहे. परकोटाआतील ४० विहिरींपैकी तब्बल २५ विहिरी कोरड्या पडल्या असून, नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.गाळ उपसा होणे गरजेचेस्थानिक रहिवाशांच्या मते गेटच्या आतील ४० ते ४५ वर्षांपासून विहिरींची स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे विहिरीत कचरा व गाळ साचला आहे. त्या स्वच्छ केल्यास पाणी उपलब्ध होऊ शकेल. विहिरीचा गाळ उपसा करणे, टॅन्करद्वारे पाणी पुरवठा करणे, बोअरवेल करणे अशाप्रकारची कामे प्रशासनाने त्वरीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.यासंदर्भात महापालिका आयुक्तांना शंभरावर स्थानिक रहिवाशांनी स्वाक्षरी केलेले निवेदन सोपविले आहे. यावेळी विजय अग्निहोत्री, बंडु बाबरेकर, विलास काळे, प्रमोद गंगात्रे, पप्पु खडसे, विमल कारंजकर, पंकज धर्माळे, शाम शिंगारे, रमेश कोनलाडे, आर.एम.माकोडे, रविंद्र इंगळे, ज्ञानेश्वर भोरे, सुरेश वानखडे, एन.के.जोशी, गजानन गंगात्रे, रेखा लोखंडे, वैशाली कुऱ्हेकर, हर्षदा ठोसर, जयश्री भिसीकर, अपर्णा बनसोड, माधुरी अनासाने, आशिष पांडे, अरुणा पंढरपुरे, शोभा खोलापुरे, मालती जहागीरदार, अजय गुल्हाने, विजया पाटणे आदी उपस्थित होते. शंभर वर्षांपासून बुधवारा परिसरातील नागरिक ऐतिहासीक विहिरीच्या पाण्याचा उपयोग करीत आहेत. मात्र, याच विहिरींमध्ये गणपती, दुर्गादेवी विसर्जन होत असल्यामुळे गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा कल बोअरवेलकडे अधिक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकसंख्यावाढीसोबतच पाण्याची मागणी वाढत आहे. त्यातच शहर सिमेंटीकरण होत असल्याने पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी लोकचळवळीतून नागरिकांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा, रेनहार्वेस्टिंगसारख्या उपाययोजना करणे व जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे मत महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे विहिरी स्वच्छतेचा विषय घेऊन जात आहे. मात्र, त्यांचा कल बोअरवेलकडे अधिक आहे. विहिरीची स्वच्छता करावी, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत.- बंडू बाबरेकर, नागरिकया ब्रिटिशकालीन विहिरींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने त्या पहिल्यांदाच आटल्यात. त्यामुळे प्रथमच पाणीटंचाई भासत आहे. प्रशासनाने विहिरींच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.- विजय अग्निहोत्री, नागरिकविहिरीतील गाळ उपसण्याचे काम 'रिस्की' आहे. विहिरींच्या स्वच्छतेसाठी मशिनचा वापर केला जाईल. दोन दिवसांत मशीन येईल. त्यानंतर विहिरी सफाईचे काम सुरु होईल.- हेमंतकुमार पवार,महापालिका आयुक्तदरवर्षी मे महिन्यात शहरातील विहिरी कोरड्या पडतात. जुन्या अमरावतीत पाणीसाठा चांगला आहे. विहिरीतील गाळ मशिनद्वारे काढल्यास तो प्रश्न निकाली लागेल.- विलास इंगोले,नगरसेवक, बुधवारा

या विहिरी पडल्या कोरड्याबुधवारा चौकातील आझाद हिन्द मंडळ स्थित अग्निहोत्री यांच्या वाड्यातील ऐतिहासीक विहिर कोरडी ठण पडल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसली. त्याचप्रमाणे निलकंठ मंडळाजवळील शाळेच्या आवारात असणारी विहिर, डोळे वाड्याजवळील विहिर, कोदाळे वाड्यातील विहिर, बंजरंग चौकातील विहिर याच्यासह अन्य काही विहिरीतील पाणी आटल्याचे निदर्शनास येत आहे.