शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

शंभर वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक विहिरी कोरड्या ठण्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:08 IST

परकोटाच्या आतील बुधवारा परिसरातील शंभर वर्षांपूर्वीच्या बहुतांश ऐतिहासिक विहिरी आटल्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. विहिरींतील गाळ काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला.

ठळक मुद्देरहिवासी त्रस्त : बुधवारा परिसरात पाणीटंचाईचे सावट

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परकोटाच्या आतील बुधवारा परिसरातील शंभर वर्षांपूर्वीच्या बहुतांश ऐतिहासिक विहिरी आटल्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. विहिरींतील गाळ काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रथमच नागरिकांना पाणीटंचाईची झळ पोहचली आहे. परकोटाआतील ४० विहिरींपैकी तब्बल २५ विहिरी कोरड्या पडल्या असून, नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.गाळ उपसा होणे गरजेचेस्थानिक रहिवाशांच्या मते गेटच्या आतील ४० ते ४५ वर्षांपासून विहिरींची स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे विहिरीत कचरा व गाळ साचला आहे. त्या स्वच्छ केल्यास पाणी उपलब्ध होऊ शकेल. विहिरीचा गाळ उपसा करणे, टॅन्करद्वारे पाणी पुरवठा करणे, बोअरवेल करणे अशाप्रकारची कामे प्रशासनाने त्वरीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.यासंदर्भात महापालिका आयुक्तांना शंभरावर स्थानिक रहिवाशांनी स्वाक्षरी केलेले निवेदन सोपविले आहे. यावेळी विजय अग्निहोत्री, बंडु बाबरेकर, विलास काळे, प्रमोद गंगात्रे, पप्पु खडसे, विमल कारंजकर, पंकज धर्माळे, शाम शिंगारे, रमेश कोनलाडे, आर.एम.माकोडे, रविंद्र इंगळे, ज्ञानेश्वर भोरे, सुरेश वानखडे, एन.के.जोशी, गजानन गंगात्रे, रेखा लोखंडे, वैशाली कुऱ्हेकर, हर्षदा ठोसर, जयश्री भिसीकर, अपर्णा बनसोड, माधुरी अनासाने, आशिष पांडे, अरुणा पंढरपुरे, शोभा खोलापुरे, मालती जहागीरदार, अजय गुल्हाने, विजया पाटणे आदी उपस्थित होते. शंभर वर्षांपासून बुधवारा परिसरातील नागरिक ऐतिहासीक विहिरीच्या पाण्याचा उपयोग करीत आहेत. मात्र, याच विहिरींमध्ये गणपती, दुर्गादेवी विसर्जन होत असल्यामुळे गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा कल बोअरवेलकडे अधिक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकसंख्यावाढीसोबतच पाण्याची मागणी वाढत आहे. त्यातच शहर सिमेंटीकरण होत असल्याने पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी लोकचळवळीतून नागरिकांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा, रेनहार्वेस्टिंगसारख्या उपाययोजना करणे व जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे मत महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे विहिरी स्वच्छतेचा विषय घेऊन जात आहे. मात्र, त्यांचा कल बोअरवेलकडे अधिक आहे. विहिरीची स्वच्छता करावी, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत.- बंडू बाबरेकर, नागरिकया ब्रिटिशकालीन विहिरींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने त्या पहिल्यांदाच आटल्यात. त्यामुळे प्रथमच पाणीटंचाई भासत आहे. प्रशासनाने विहिरींच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.- विजय अग्निहोत्री, नागरिकविहिरीतील गाळ उपसण्याचे काम 'रिस्की' आहे. विहिरींच्या स्वच्छतेसाठी मशिनचा वापर केला जाईल. दोन दिवसांत मशीन येईल. त्यानंतर विहिरी सफाईचे काम सुरु होईल.- हेमंतकुमार पवार,महापालिका आयुक्तदरवर्षी मे महिन्यात शहरातील विहिरी कोरड्या पडतात. जुन्या अमरावतीत पाणीसाठा चांगला आहे. विहिरीतील गाळ मशिनद्वारे काढल्यास तो प्रश्न निकाली लागेल.- विलास इंगोले,नगरसेवक, बुधवारा

या विहिरी पडल्या कोरड्याबुधवारा चौकातील आझाद हिन्द मंडळ स्थित अग्निहोत्री यांच्या वाड्यातील ऐतिहासीक विहिर कोरडी ठण पडल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसली. त्याचप्रमाणे निलकंठ मंडळाजवळील शाळेच्या आवारात असणारी विहिर, डोळे वाड्याजवळील विहिर, कोदाळे वाड्यातील विहिर, बंजरंग चौकातील विहिर याच्यासह अन्य काही विहिरीतील पाणी आटल्याचे निदर्शनास येत आहे.