शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भांडवलदारांच्या हितासाठीच महामार्ग

By admin | Updated: March 5, 2017 00:17 IST

शेतकऱ्यांच्या अल्प किंमतीत जमीनी घेवून उभारण्यात येणारा कृषी समृध्दी महामार्ग हा भांडवलदारांच्या लाभासाठी होत आहे.

वीरेंद्र जगतापांचा आरोप : महामार्ग विरोधी संघर्ष रॅलीत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभागधामणगाव रेल्वे/ शिवनी रसुलापूर : शेतकऱ्यांच्या अल्प किंमतीत जमीनी घेवून उभारण्यात येणारा कृषी समृध्दी महामार्ग हा भांडवलदारांच्या लाभासाठी होत आहे. हा महामार्ग तयार करण्याऐवजी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी आ़विरेंद्र जगताप यांनी केली.नागपूर येथून निघालेल्या महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या रॅलीचे तालुक्यात आष्टा येथे आगमन झाले यावेळी या रॅलीत शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ़विरेंद्र जगताप होते. यावेळी रॅलीत तुकाराम भस्मेसह अनेकांची उपस्थिती होती़ मुंबई येथे समुद्रमार्गाने येणारा भांडवलदारांचा पक्कामाल नागपूरात व येथून मुंबईत पोहचविल्या जाणाऱ्या मालासाठी हा महामार्ग उभारला जात आहे़परदेशी कंपन्याना या महामार्गाचा उपयोग होणार आहे़ एकीकडे शेतमालास भाव नाही, हरभरा, तूर खरेदी केंद्राची अवस्था बिकट आहे़ शेतकऱ्यांचा जीव जात असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस शेतकऱ्यांच्या जीवावर उठून हा महामार्ग उभारत आहे़ महामार्ग उभारल्यापेक्षा या रककमेतून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी आ़विरेंद्र जगताप यांनी केली आहे़ धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यातील एकही शेतकरी महामार्ग उभारण्यासाठी जमीनीचा तुकडाही देणार नाही. प्रशासनाने अधीक दबाव टाकण्याचे काम केल्यास जशास तसे उत्तर देण्यास सर्व शेतकरी समर्थ आहे व शेतकरी आपल्या पाठीशी असल्याचे आ़जगताप यांनी महामार्ग संघर्षविरोधी रॅलीत बोलताना सांगीतले. (प्रतिनिधी)