शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांमधील ३५३ मृत्युप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST

(कॉमन) अमरावती : राज्यात तीन वर्षात शासकीय आश्रमशाळांमधील ३५३ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यात ज्या विद्यार्थ्यांचे मृत्यू खुद्द आश्रमशाळेतच ...

(कॉमन)

अमरावती : राज्यात तीन वर्षात शासकीय आश्रमशाळांमधील ३५३ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यात ज्या विद्यार्थ्यांचे मृत्यू खुद्द आश्रमशाळेतच झाले, अशा मृत्यू प्रकरणांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद घोडाम यांनी केली आहे. याबाबत मुख्यंमत्री उद्धव ठाकरे, आदिवासी विकास मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त नाशिक यांना निवेदन पाठविले आहे.

!‘लोकमत‘ने ११ सप्टेंबर रोजी ' तीन वर्षात ३५३ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू ' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले आहे. निवेदनात म्हटल्यानुसार, राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या जनतेची सामाजिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन १९७२-७३ पासून क्षेत्र विकासाचा दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. अशा भागांचा मूलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना मिळावा, यासाठी तेथे मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा स्थापन झालेल्या आहे. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. राज्यात ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त कार्यालये व २९ एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालये असून या अंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील ४१२ तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील १४० शासकीय आश्रमशाळा आहेत. तथापि मंजूर पैकी ५२९ आश्रमशाळा कार्यरत आहेत. यातील काही शासकीय आश्रमशाळांत सन २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षात नाशिक विभागात १६६, ठाणे विभागात ८३, अमरावती विभागात ५१, नागपूर विभागात ५३ असे एकूण ३५३ विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेले आहे.

------------------

बॉक्स

नेमका आक्षेप कुठे ?

आजारपण, सर्पदंश, उंचावरून पडणे, विहिरीत पडणे अशा विविध कारणास्तव खुद्द शासकीय आश्रमशाळेत जे मृत्यू झालेले आहेत अशा मृत्यूची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ट्रायबल फोरमने केली आहे.

-------------------

कोवळ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे आयुष्य एवढे स्वस्त नाही. त्यांच्या आरोग्याची काळजी न घेतली जाणे हे गंभीर असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यु प्रकरणांची सखोल चौकशी करून यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

- डॉ. संदीप धुर्वे, आमदार, आर्णी-केळापूर