शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

येथे मरणानंतरही संपेना यातनांचे भय!

By admin | Updated: June 8, 2015 00:27 IST

असे कविवर्य कै. सुरेश भट यांनी आपल्या कवितेत म्हटले असले तरी परतवाडा येथील स्मशानभूमी गैरसोयींच्या विळख्यात ..

स्मशानभूमीवर अवकळा : अंधारातच उरकावे लागतात अंत्यसंस्कार सुनील देशपांडे अचलपूरजाताना इतके मजला सरणावर कळले होतेमरणाने केली सुटका जगण्याने छळले होतेअसे कविवर्य कै. सुरेश भट यांनी आपल्या कवितेत म्हटले असले तरी परतवाडा येथील स्मशानभूमी गैरसोयींच्या विळख्यात असल्याने मरणानंतरही माणसाची छळातून सुटका होत नाही. येथील स्मशानभूमीत अनेक समस्या असल्याने मृतदेहाची अवहेलना तर होतेच पण अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना अनेक गैरसोयींना तोंड देत अंत्यसंस्कार करावा लागतो. शुक्रवारी रात्री स्मशानभूमीतील विद्युत पुरवठा खंडित असल्याने एका पार्थिवावर अंधारात अंत्यंस्कार करावा लागल्याने अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांनी संताप व्यक्त केला. गावात स्मशानभूमी असणे सामाजिक गरज आहे. त्या स्मशानभूमीत सोई सुविधा असणे अपेक्षित असते. तसेच आपण ज्या गावात जन्मलो तेथेच आपल्याला मरण येऊन येथेच आपला अंत्यसंस्कार व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण परतवाडा येथील स्मशनभूमीत विद्युत पुरवठा असूनही तो बरेचदा खंडित झालेला असतो. काही खांबांवरील लाईट गेलेले आहेत. मुख्य रस्त्यानंतर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बेशरमच्या झाडांनी विळखा घातला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी एखाद्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यास रस्त्यावर बरेचदा विंचू, साप असे सरपटणारे प्राणी लोकांच्या दृष्टीस पडतात.अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी व्यवस्थित सोय नाही. स्मशानभूमीजवळ पाण्यासाठी एक हापसी लावण्यात आलेली असून त्यावर मोटारीची सोय नाही. स्मशानभूमीत स्वच्छतेचा अभाव असतो. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामना तर करावाच लागतो. पण येथील गैरसोय बघून त्रासलेल्या जीवनातून मरणही नकोसे वाटते. शुक्रवारी पंचायत समितीमध्ये लिपीक असलेले विवेक दिवाकर यांचे निधन झाले. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता त्यांना बिच्छन नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. स्मशानभूमीतील विद्युत पुरवठा खंडित झालेला असल्याने स्वर्गरथ या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिवाकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. अचलपूर-परतवाडा मार्गावरुन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या साधारण एक किमी रस्त्यावरील पथदिवेही बंद होते. त्यामुळे अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये संताप व्यक्त होत होता. रस्त्याच्या कडेला झाडेझुडूपी वाढली असून बेशरमच्या झाडांनी दाटी केली आहे. अनेकदा येथील विद्युत पुरवठा खंडित असतो. शुक्रवारी विवेक दिवाकर यांच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लाईट नसल्योन अंधार होता. स्वर्गरथाच्या लाईटाच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावा लागला. रस्त्यावरील पथदिवे बंद होते. या समस्यांची तक्रार मी पालिकेच्या तक्रार बुकात केली.- संजय चोखे,अध्यापक, सुबोध हायस्कूल.स्मशानभूमीतील झालेल्या गैरसोईची संपूर्ण चौकशी करुन त्यात आमचे अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई करुन रस्त्याची झाडे झुडुपी तोडण्यात येतील. वीज पुरवठा का खंडित झाला याचीही माहिती घेणार आहे.- धनंजय जावळीकर, मुख्याधिकारी, अचलपूर.