शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पावसाची दडी, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:19 IST

मोर्शी : राज्याच्या इतर भागात पावसाने धुमाकूळ घालून अतोनात नुकसान केले असले तरी मोर्शी तालुका पावसाच्या सरासरीत माघारला ...

मोर्शी : राज्याच्या इतर भागात पावसाने धुमाकूळ घालून अतोनात नुकसान केले असले तरी मोर्शी तालुका पावसाच्या सरासरीत माघारला आहे. १० ते १२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या १०१ टक्के पावसाच्या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी पिके उभी केली. उन्ह पावसाच्या खेळात दुबार पेरणीही केली. पिके जोमाने वाढायला लागताच खते, जंतुनाशक आदी खर्च केला. परंतु १०, १२ दिवसात पावसाने दडी मारल्याने उभे पिके सुकायला लागली. राज्यात इतरत्र नुकसानदायक पाऊस पडला. पण मोर्शी तालुक्यात या काळात रिमझिम पाऊस पडला. हा सरासरीपेक्षा कमी असून विहिरींची पातळी वाढली नाही. त्यामुळे सिंचनाची सोय नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांना आभाळाकडे आशाळभूत नजरेने पाहण्याशिवाय पर्याय नाही. ज्यांच्याकडे विहिरी आहेत त्यांना विहिरीत साचलेले चार-सहा फूट पाणी उपसल्यावर पुढे काय, हा प्रश्न आहे.

अपुऱ्या पावसाने शिवरातील ओढे, नालेही कोरडे

तापमान वाढले असून दुपारचे उन्हात पिके कोमेजून जातात. हे उघड्या डोळ्याने पाहू न शकणारा शेतकरी दुपारच्या वेळी घरची वाट पकडतो. कारण वाढत्या महागाईत अधिक खर्च करून पीक उभे केले. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचे प्रमाण जास्त होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणी करावी लागली. झालेला खर्च भरून काढण्याशिवाय उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा आहे.