शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

सर्वत्र मुसळधार पाऊस, अप्पर वर्धा प्रकल्प ५० टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:11 IST

मोर्शी : दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असून, सर्वत्र पावसाने कहर केला आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या १३ ...

मोर्शी : दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असून, सर्वत्र पावसाने कहर केला आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या १३ दरवाजे असलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पात ५० टक्के म्हणजे २७८.६१ दशलक्ष घनमीटर पाणी आहे.

धरणाची पाणी साठवण क्षमता ५६४.०५ दलघमी व ३४२.४९ मीटर आहे. गतवर्षी जुलै महिन्यात अप्पर वर्धा धरण प्रकल्पात ३८६.३७ दलघमी म्हणजेच ६८.५० टक्के पाणी होते. जिल्ह्यातील वरूड, मोर्शी तालुक्यात कितीही जोरदार पाऊस झाला तरी त्याचा फायदा अप्पर वर्धा प्रकल्पाला होत नाही. कारण अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र हे मध्य प्रदेशात आहे. जर मध्य प्रदेशात तसेच सालबर्डी व सातपुड्याच्या पर्वतरांगात मुसळधार पाऊस कोसळला, तरच अप्पर वर्धा प्रकल्पातील पाण्याचा स्तर वाढतो. अप्पर वर्धा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, अप्पर वर्धा प्रकल्प ओव्हर फ्लो व्हायला बराच अवकाश आहे. येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये मध्य प्रदेशात जोरदार मुसळधार पाऊस झाला, तरच ऑगस्ट महिन्यात अप्पर वर्धा प्रकल्प पूर्णपणे भरू शकतो.

प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यानंतर ओसांडून वाहणाऱ्या प्रपाताचे रोमहर्षक नैसर्गिक सौंदर्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी दरवर्षी या प्रकल्पावर लोकांची गर्दी उसळत असते परंतु या दोन-तीन दिवसांत सर्वत्र पाऊस पडत असूनसुद्धा अप्पर वर्धा धरण सद्यस्थितीत ५० टक्क्यांवर असल्याचे येथील प्रकल्प देखरेख अधिकारी गजानन साने यांनी सांगितले.