शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

शहरात डोळ्यांच्या साथीने मुले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:22 IST

जेमतेम पावसाची सुरुवात झाली असतानाच शहरात डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढले आहे. या आजारांनी मुले त्रस्त असून, सध्या प्रत्येक डोळ्याच्या रुग्णालयात मोठी गर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्देशासकीय रुग्णालये फुल्ल

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जेमतेम पावसाची सुरुवात झाली असतानाच शहरात डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढले आहे. या आजारांनी मुले त्रस्त असून, सध्या प्रत्येक डोळ्याच्या रुग्णालयात मोठी गर्दी दिसून येत आहे.आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. यामध्ये डोळ्याचा आजार प्रामुख्याने जाणवत आहे. महापालिका हद्दीत शासकीय व खासगी मिळून २५ डोळ्यांची रुग्णालये आहेत. प्रत्येक रुग्णालयात १० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. डोळ्यांचा भाग नाजूक असल्याने घरगुती उपचारावर भर न देता तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयातील चिकित्सक डॉ. नम्रता सोनोने यांनी केले आहे.लक्षणेडोळा लालसर होणे, आत टोचल्यासमान वेदना होणे, चिपड येणे, बाहेर फिरताना साधारण हवेचा त्रास जाणवणे आदी डोळे येण्याची लक्षणे आहेत.उपाययोजनासध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने धुळीसह घाण पाण्याला अप्रत्यक्ष स्पर्श होतो. त्यामुळे कुठल्याही वस्तू हाताळताना हात स्वच्छ धुवून घ्यावे. डोळ्यांजवळील भागावर हलक्या हाताने कोरड्या कपड्याने पुसून काढावे. पुन्हा-पुन्हा तोच रुमाल वापरल्यास त्याचे इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता आहे. शक्यतोवर टिश्यू पेपरचा वापर करावा. घाण पाण्याचा हात डोळ्यांना लागल्यास व्हायरल इन्फेक्शन होऊन डोळ्यांचा आजार होऊ शकतो.डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या उपचारडोळे हे शरीराचे अत्यंत नाजूक अवयव असल्याने त्यासंबंधी कुठलाही त्रास जाणवल्यास घरगुती उपचार न घेता डॉक्टरांकडे तपासणी करूनच योग्य उपचार घ्यावा. ग्रामीण भागात बहुतांश नागरिक दुकानातील निंबोळीचा वापर करतात. मात्र, हा उपचार तात्पुरता आहे. केवळ निंबोळीनेच आजार पूर्णपणे बरा होणार नाही. डोळ्याचा प्रत्येक आजार निंबोळीनेच बरा होऊ शकत नाही. त्याचे इन्फेक्शन झाल्यास धोका उद्भवू शकतो, असे नेत्रतज्ज्ञ पंकज लांडे म्हणाले.