शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डोळ्यांच्या साथीने मुले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:22 IST

जेमतेम पावसाची सुरुवात झाली असतानाच शहरात डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढले आहे. या आजारांनी मुले त्रस्त असून, सध्या प्रत्येक डोळ्याच्या रुग्णालयात मोठी गर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्देशासकीय रुग्णालये फुल्ल

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जेमतेम पावसाची सुरुवात झाली असतानाच शहरात डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढले आहे. या आजारांनी मुले त्रस्त असून, सध्या प्रत्येक डोळ्याच्या रुग्णालयात मोठी गर्दी दिसून येत आहे.आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. यामध्ये डोळ्याचा आजार प्रामुख्याने जाणवत आहे. महापालिका हद्दीत शासकीय व खासगी मिळून २५ डोळ्यांची रुग्णालये आहेत. प्रत्येक रुग्णालयात १० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. डोळ्यांचा भाग नाजूक असल्याने घरगुती उपचारावर भर न देता तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयातील चिकित्सक डॉ. नम्रता सोनोने यांनी केले आहे.लक्षणेडोळा लालसर होणे, आत टोचल्यासमान वेदना होणे, चिपड येणे, बाहेर फिरताना साधारण हवेचा त्रास जाणवणे आदी डोळे येण्याची लक्षणे आहेत.उपाययोजनासध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने धुळीसह घाण पाण्याला अप्रत्यक्ष स्पर्श होतो. त्यामुळे कुठल्याही वस्तू हाताळताना हात स्वच्छ धुवून घ्यावे. डोळ्यांजवळील भागावर हलक्या हाताने कोरड्या कपड्याने पुसून काढावे. पुन्हा-पुन्हा तोच रुमाल वापरल्यास त्याचे इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता आहे. शक्यतोवर टिश्यू पेपरचा वापर करावा. घाण पाण्याचा हात डोळ्यांना लागल्यास व्हायरल इन्फेक्शन होऊन डोळ्यांचा आजार होऊ शकतो.डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या उपचारडोळे हे शरीराचे अत्यंत नाजूक अवयव असल्याने त्यासंबंधी कुठलाही त्रास जाणवल्यास घरगुती उपचार न घेता डॉक्टरांकडे तपासणी करूनच योग्य उपचार घ्यावा. ग्रामीण भागात बहुतांश नागरिक दुकानातील निंबोळीचा वापर करतात. मात्र, हा उपचार तात्पुरता आहे. केवळ निंबोळीनेच आजार पूर्णपणे बरा होणार नाही. डोळ्याचा प्रत्येक आजार निंबोळीनेच बरा होऊ शकत नाही. त्याचे इन्फेक्शन झाल्यास धोका उद्भवू शकतो, असे नेत्रतज्ज्ञ पंकज लांडे म्हणाले.