शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: September 20, 2015 00:32 IST

महापालिका क्षेत्रातील ३३ ठिकाणी पाणी नमुने दूषित आढळल्याने शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

महापालिका शाळेच्या पाण्यात ई-कोलाय : शासकीय प्रयोग शाळेचा अहवाल वैभव बाबरेकर अमरावतीमहापालिका क्षेत्रातील ३३ ठिकाणी पाणी नमुने दूषित आढळल्याने शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यातच नऊ शाळांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल शासकीय आरोग्य प्रयोगशाळेने दिल्यामुळे शेकडो चिमुकल्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. शहरात बहुतांश ठिकाणी दूषित पाण्याच्या प्रादुर्भावामुळे हजारो नागरिक आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. मात्र, पाणी तपासणीची तसदी घेण्यात शासकीय विभागात कुचराई केली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील अन्य खासगी रुग्णालयांमध्ये जलजन्य आजारांचे रुग्ण वाढत आहेत. गोरगरीब चिमुकल्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे दुषित पाण्याच्या आकडेवारीहून दिसून येत आहे. आॅगस्ट महिन्यात जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत महापालिकेकडून १७७ पाणी नमुन्यांची अनुजीव तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ३३ पाणी नमुने दूषित आढळून आले असून ते प्रमाण १९ टक्के आहे. महापालिकेकडून विविध शाळा-महाविद्यालये व हॉटेलमधील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये तब्बल ३३ ठिकाणी दूषित पाणी आढळून आले आहेत. आरोग्य प्रयोगशाळेत पाणी नमुन्यामध्ये ई-कोलिफाम जिवांणुच्या समूहाची तपासणी केली गेली. ई-कोलिफाम समुहात असणाऱ्या जिवांणुमुळे कॉलरा, टायफाईड, कावीळ, उलट्या व डायरियासारख्या आजार उद्भवू शकतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.