शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

खापरखेडा येथे आरोग्य विभागाच्या उपाययोजना सुरू

By admin | Updated: September 20, 2014 23:42 IST

खापरखेडा येथील डायरियाचे थैमान अखेर आटोक्यात आले आहे. कॅम्पमध्ये ३५ रूग्ण, कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रूग्णालयासह इतर ठिकाणी एकूण ८० गॅस्ट्रोने बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

राजेश मालवीय - धारणीखापरखेडा येथील डायरियाचे थैमान अखेर आटोक्यात आले आहे. कॅम्पमध्ये ३५ रूग्ण, कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रूग्णालयासह इतर ठिकाणी एकूण ८० गॅस्ट्रोने बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अतिगंभीर अवस्थेतील आदिवासी महिला जानकी पटेल (३५) हिला पुढील उपचारार्थ अमरावती येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ‘खापरखेड्यात डायरियाचे थैमान, चिमुकली दगावली’चे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच त्याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी आसोले, पंचायत समितीचे बीडीओ जोशी, पाणीपुरवठा उपअभियंता, १० वैद्यकीय अधिकारी, २० आरोग्य सेवक-सेविका, जिल्हा साथरोग अधिकारी, शिघ्र प्रतिसाद पथकासह गावात डेरेदाखल असून कॅम्पमधील ३५ रूग्णांसह इतर रूग्णांवर तातडीचे उपचार सुरू आहेत. दोन हजार लोकवस्तीच्या खापरखेड्यात चार सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, ग्रामसचिव मालसच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात न आल्याने गावात दूषित पाणीपुरवठा सुरू होता. अशा दोन विहिरींना व पाण्याच्या टाकीला सील ठोकण्यात आले आहे. नजीकच्या दाबिदा येथून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात ६० अवैध नळ कनेक्शन असून नळाच्या ठिकाणी असलेले खड्डे शनिवारी बुजविण्यात आले आहेत. गावात साफसफाई व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी व आरोग्य विभागाची चमू औषधी साठ्यासह खापरखेडा येथे तळ ठोकून आहेत. अतिसाराच्या रुग्णांवर आवश्यक औषधोपचार आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. डायरियाने बाधित चिमुकलीचा नाहक बळी गेल्याने यासाठी जबाबदार ग्रामसचिवावर जिल्हा प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याने आदिवासींनी तीव्र संताप व्यक्त केला.