शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

आरोग्य अभियानात दोघांची सेवा समाप्त तर एकाची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात दोन कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे, तर एका कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश अचानक धडकल्याने ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात दोन कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे, तर एका कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश अचानक धडकल्याने अभियानातील कर्मचार्यांच्या चितेंत पडले आहे. विशेष म्हणजे ऐन कोरोनाच्या संकटकाळात थेट आदेश धडकल्याने मिनीमंत्रालयात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

गत काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ होत असतानाच राष्ट्रीय ग्रामीण मिशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यावर होत असलेल्या कारवाईमुळे राजकीय शह-काटशहाचे राजकारण रंगत आहे. एनआरएचएमचे जिल्हा व्यवस्थापक अशोक कोठारी यांची पुणे येथे बदली करण्यात आली, तर यापूर्वी याच अभियानातील जिल्हा सनियंत्रण अधिकारी असलेल्या प्रफुल्ल रिधोरे यांची गत आठवड्यात सेवा समाप्त करण्यात आली. यानंतर दोनच दिवसांपूर्वी जिल्हा आशा समन्वयक शशिकांत सभाने यांची सुद्धा सेवा समाप्तीचा आदेश धडकले. जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना आरोग्य मिशनमधील अधिकाऱ्यांच्या उचलबांगडीचे सत्र सध्या सुरू आहे. अशातच आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात जिल्हा व्यवस्थापक अशोक कोठारी यांची समकक्ष पदावर पुण्यात बदली केल्यानंतर या पदावर वर्णी लावण्यासाठी जोरदार लाॅबिंग सुरू झाले आहे. या आरोग्य अभियानाला केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, यावर मिनीमंत्रालयातील पदाधिकाऱ्यांचेही पाहिजे तसे नियंत्रण नाही. त्यामुळे या पदावर वर्णी लावण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग लावले आहेत. यातही राजकीय दबाब तंत्राचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.