शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुख्याधिकारी निघाले वराह पकडायला!

By admin | Updated: February 27, 2015 00:19 IST

शेंदूरजनाघाट नगरपरिषद अंतर्गत वराहांचा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू आणि विषाणूजन्य तापाचा धोका लक्षात घेता ...

वरुड : शेंदूरजनाघाट नगरपरिषद अंतर्गत वराहांचा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू आणि विषाणूजन्य तापाचा धोका लक्षात घेता नगरपरिषदेने स्वच्छता मोहिमेसह वराहांनासुध्दा गावातून हाकलून लावण्याचा निर्धार केला केला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश राठोड हेदेखील या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांसह सहभागी झाले होते.वरुड तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ वाढली होती. यामध्ये शेकडो रुग्णांचे बळी गेले. तर दोन वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूनेसुध्दा वरुड शहरातील दोघांचे बळी घेतले. तालुक्यात स्वाईन फ्लूबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू जनजागृती तसेच स्वच्छता मोहिमे अंतर्गत तालुक्यातील शेंदूरजनाघाट नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम आणि शहरात होत असलेला वराहांच्या मुक्त संचाराला आळा घालण्याकरिता वराह पकडण्याची मोहीम आरोग्य विभागाच्यावतीने सुरु केली. आरोग्य कर्मचारी असताना खुद्द नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश राठोड या मोहिमेत सहभागी झाले आहेत. नगरपरिषदेमध्ये आलेल्या नागरिकांनी विचारणा केली तर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून साहेब वराह पकडायला गेले असल्याचे सांगितले जात होते. यामुळे साहेबच वराह पकडत असेल तर कर्मचाऱ्यांची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित केला गेला. शहरात वराहाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे स्वाईन फ्लू व इतर आजारांचे प्रमाण वाढलू नये दृष्टिने रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून शहरातून वराहांना हद्दपार करण्याबाबत वराह मालकांना समज दिली जात आहे. वराह पालकांनी नगरपालिकेच्या पशू विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने वराह पकडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी )