शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

मुख्याधिकारी निघाले वराह पकडायला!

By admin | Updated: February 27, 2015 00:19 IST

शेंदूरजनाघाट नगरपरिषद अंतर्गत वराहांचा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू आणि विषाणूजन्य तापाचा धोका लक्षात घेता ...

वरुड : शेंदूरजनाघाट नगरपरिषद अंतर्गत वराहांचा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू आणि विषाणूजन्य तापाचा धोका लक्षात घेता नगरपरिषदेने स्वच्छता मोहिमेसह वराहांनासुध्दा गावातून हाकलून लावण्याचा निर्धार केला केला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश राठोड हेदेखील या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांसह सहभागी झाले होते.वरुड तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ वाढली होती. यामध्ये शेकडो रुग्णांचे बळी गेले. तर दोन वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूनेसुध्दा वरुड शहरातील दोघांचे बळी घेतले. तालुक्यात स्वाईन फ्लूबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू जनजागृती तसेच स्वच्छता मोहिमे अंतर्गत तालुक्यातील शेंदूरजनाघाट नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम आणि शहरात होत असलेला वराहांच्या मुक्त संचाराला आळा घालण्याकरिता वराह पकडण्याची मोहीम आरोग्य विभागाच्यावतीने सुरु केली. आरोग्य कर्मचारी असताना खुद्द नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश राठोड या मोहिमेत सहभागी झाले आहेत. नगरपरिषदेमध्ये आलेल्या नागरिकांनी विचारणा केली तर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून साहेब वराह पकडायला गेले असल्याचे सांगितले जात होते. यामुळे साहेबच वराह पकडत असेल तर कर्मचाऱ्यांची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित केला गेला. शहरात वराहाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे स्वाईन फ्लू व इतर आजारांचे प्रमाण वाढलू नये दृष्टिने रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून शहरातून वराहांना हद्दपार करण्याबाबत वराह मालकांना समज दिली जात आहे. वराह पालकांनी नगरपालिकेच्या पशू विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने वराह पकडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी )