शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

आॅनलाईनमुळे डोकेदुखी!

By admin | Updated: February 4, 2017 00:06 IST

दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणानुसार आॅनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

किचकट प्रक्रिया : दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश अमरावती : दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणानुसार आॅनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या आॅनलाईनमुळे दुर्गम व आदिवासी भागातील पालकांची डोकेदुखी वाढणार आहे. शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात विविध शाळांत २५ टक्के आरक्षणानुसार प्रवेश दिला जाणार आहे. शासनाने १० जानेवारी २०१७ रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यातील विनाअनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. २५ टक्के जागांवर प्रवेशासंदर्भात आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, यासाठी शाळांची तालुकानिहाय यादी उपलब्ध करण्यात आली आहे. पालकांना आॅनलाईन प्रवेश अर्ज भरल्यास ५ फेब्रुवारी ते २१ फेब्रवारी ही मुदत राहणार आहे. पहिली लॉटरी २७ व २८ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. पालकांनी विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १ ते ९ मार्च अशी राहणार आहे. शाळांनी विद्यार्थ्यांची जाग रिक्त असल्याचे दर्शविण्याबाबतची मुदत १० ते ११ मार्च यादरम्यान राहणार आहे. दुसरी लॉटरी काढण्याची मुदत १४ व १५ मार्च राहणार आहे. तिसरी लॉटरी २४ मार्च, चौथी लॉटरी ७ एप्रिल व पाचवी लॉटरी १८ एप्रिल काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा जुन्याचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा, सामाजिक वंचित घटक, जातीचा दाखला, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला एक लाखापेक्षा कमी, दिव्यांग विद्यार्थ्यासाठी ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या बालकांचे किमान वय पाच वर्षे चार महिने असावे. (प्रतिनिधी)