शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

‘तो’ पेट्रोल घेऊन शिरला ग्रामपंचायतमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST

त्रस्त युवकाकडून आत्मदहनाची धमकी : नांदगांव पेठ : ग्रामपंचायतीने लेखी उत्तर न देता, निवेदनाला वारंवार केराची टोपली दाखविल्याने मंगळवारी ...

त्रस्त युवकाकडून आत्मदहनाची धमकी :

नांदगांव पेठ : ग्रामपंचायतीने लेखी उत्तर न देता, निवेदनाला वारंवार केराची टोपली दाखविल्याने मंगळवारी नीलेश रघुवंशी नामक युवकाने चक्क पेट्रोलची बॉटल घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला. उत्तर द्या, अन्यथा आत्मदहन करतो, असा पवित्रा त्याने घेतल्याने नांदगावात खळबळ उडाली होती.

नांदगावपेठमधील बाळापुरे ले-आउट स्थित एका खुल्या जागेवर वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळाचे खेळाडू कबड्डी खेळतात. ग्रामपंचायतने त्यांना जागा खाली करण्याची नोटीस देऊन पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावरून खेळाडू आणि ग्रामपंचायतीमध्ये वाद निर्माण झाला असल्याचे समजते. सदर जागेवर स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयाची इमारत असून, या जागेसंबंधी महाविद्यालय व वीर केसरी मंडळ यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. विभागीय आयुक्तांनी महाविद्यालयाच्या बाजूने निकाल दिला, तर ग्रामपंचायतने जागेसंबंधी मंडळाला ठराव दिला होता. विभागीय आयुक्तांनी जागा खाली करण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत. मात्र, या प्रकरणात ग्रामपंचायत हस्तक्षेप करीत असून, पदाधिकाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप मंडळाचे पदाधिकारी नीलेश रघुवंशी यांनी केला आहे.

पोलीस संरक्षणात जागा खाली करण्याचा ठराव मासिक बैठकीत घेतला आहे का , अशी विचारणा नीलेश रघुवंशी यांनी केली. मात्र , रघुवंशी यांना ग्रामपंचायतच्यावतीने कोणतेही लेखी उत्तर देण्यात येत नसून, केवळ टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने मंगळवारी पेट्रोलची बॉटल घेऊन ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, अन्यथा मी आत्मदहन करतो, असा पवित्रा घेतला. वृत्त लिहिस्तोवर कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती तसेच पोलीसदेखील घटनास्थळी पोहोचले नव्हते, हे विशेष!

बॉक्स

विभागीय आयुक्तांच्या आदेशांचा सन्मान करीत बाळापुरे ले-आऊटमधील खुल्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गेले असता, त्याठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाद करून हाकलून लावले. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांत तक्रार करावी लागली. ही प्रक्रिया ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सहीनिशी झालेली आहे. त्या सध्या रजेवर असल्याने नीलेश रघुवंशी यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही. ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची मनमानी करीत नसून, ग्रामविकास अधिकारी रुजू झाल्यानंतर त्यांना लेखी उत्तर देण्यात येईल.

- कविता डांगे, सरपंच