शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

‘तो’ पेट्रोल घेऊन शिरला ग्रामपंचायतमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST

त्रस्त युवकाकडून आत्मदहनाची धमकी : नांदगांव पेठ : ग्रामपंचायतीने लेखी उत्तर न देता, निवेदनाला वारंवार केराची टोपली दाखविल्याने मंगळवारी ...

त्रस्त युवकाकडून आत्मदहनाची धमकी :

नांदगांव पेठ : ग्रामपंचायतीने लेखी उत्तर न देता, निवेदनाला वारंवार केराची टोपली दाखविल्याने मंगळवारी नीलेश रघुवंशी नामक युवकाने चक्क पेट्रोलची बॉटल घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला. उत्तर द्या, अन्यथा आत्मदहन करतो, असा पवित्रा त्याने घेतल्याने नांदगावात खळबळ उडाली होती.

नांदगावपेठमधील बाळापुरे ले-आउट स्थित एका खुल्या जागेवर वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळाचे खेळाडू कबड्डी खेळतात. ग्रामपंचायतने त्यांना जागा खाली करण्याची नोटीस देऊन पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावरून खेळाडू आणि ग्रामपंचायतीमध्ये वाद निर्माण झाला असल्याचे समजते. सदर जागेवर स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयाची इमारत असून, या जागेसंबंधी महाविद्यालय व वीर केसरी मंडळ यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. विभागीय आयुक्तांनी महाविद्यालयाच्या बाजूने निकाल दिला, तर ग्रामपंचायतने जागेसंबंधी मंडळाला ठराव दिला होता. विभागीय आयुक्तांनी जागा खाली करण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत. मात्र, या प्रकरणात ग्रामपंचायत हस्तक्षेप करीत असून, पदाधिकाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप मंडळाचे पदाधिकारी नीलेश रघुवंशी यांनी केला आहे.

पोलीस संरक्षणात जागा खाली करण्याचा ठराव मासिक बैठकीत घेतला आहे का , अशी विचारणा नीलेश रघुवंशी यांनी केली. मात्र , रघुवंशी यांना ग्रामपंचायतच्यावतीने कोणतेही लेखी उत्तर देण्यात येत नसून, केवळ टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने मंगळवारी पेट्रोलची बॉटल घेऊन ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, अन्यथा मी आत्मदहन करतो, असा पवित्रा घेतला. वृत्त लिहिस्तोवर कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती तसेच पोलीसदेखील घटनास्थळी पोहोचले नव्हते, हे विशेष!

बॉक्स

विभागीय आयुक्तांच्या आदेशांचा सन्मान करीत बाळापुरे ले-आऊटमधील खुल्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गेले असता, त्याठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाद करून हाकलून लावले. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांत तक्रार करावी लागली. ही प्रक्रिया ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सहीनिशी झालेली आहे. त्या सध्या रजेवर असल्याने नीलेश रघुवंशी यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही. ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची मनमानी करीत नसून, ग्रामविकास अधिकारी रुजू झाल्यानंतर त्यांना लेखी उत्तर देण्यात येईल.

- कविता डांगे, सरपंच