शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

‘त्याने’ परतविले सापडलेले पाकीट, ‘सोशल मीडिया’ ठरला दुवा !

By admin | Updated: February 2, 2015 22:56 IST

सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत नेहमीच चर्चा सुरु असते. परंतु नाण्याची दुसरी बाजू नेहमीच दुर्लक्षित राहते. परंतु एका एसटी डेपो परिसरात सापडलेले पैशाचे पाकीट ‘फेसबुक’च्या माध्यमातून परत करून

जितेंद्र दखणे - अमरावतीसोशल मीडियाच्या गैरवापराबाबत नेहमीच चर्चा सुरु असते. परंतु नाण्याची दुसरी बाजू नेहमीच दुर्लक्षित राहते. परंतु एका एसटी डेपो परिसरात सापडलेले पैशाचे पाकीट ‘फेसबुक’च्या माध्यमातून परत करून एका तरूणाने प्रामाणिकपणाचा आगळा परिचय तर दिलाच. पण, सोशल मिडियाचा कसा सदुपयोग होऊ शकतो, याचे उदाहरणही घालून दिले. जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत प्रमोद ताडे २५ जानेवारी रोजी अमरावती येथून त्यांच्या मूळ गावी म्हणजे अकोट तालुक्यातील निजामपूर येथे गेले होते. त्याच दिवशी सायंकाळी एसटीने परतीचा प्रवास करीत असताना त्यांचे पैशाचे पाकीट बसस्थानकावर हरविले. वाहकाने तिकीट काढण्यास सांगितले असता त्यांच्या लक्षात पाकीट हरविल्याची बाब आली. अचानकच हा प्रसंग ओढवल्यामुळे त्यांच्याकडे तिकिटासाठीही पैसे नव्हते. शेवटी सहप्रवाशांनी त्यांना धीर दिला. इतकेच नव्हे, तर श्रीनिवास उदापुरे यांनी माणुसकीचा परिचय देत त्यांचे प्रवास भाडे दिले. दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्याने हरविलेल्या पाकिटातील एसबीआय व अलाहाबाद बँकेचे एटीएम ताडे यांनी २७ जानेवारी रोजी लॉक केले. एक दिवस अकस्मात त्यांच्या भ्रमणध्वनीवर रोशन मनोहरलाल गुप्ता नामक अमरावती येथील व्यक्तीचा कॉल आला. सदर व्यक्तीने त्यांना त्यांचे हरविलेले पाकीट सुरक्षित असल्याची माहिती दिली. ताडे यांना ही बातमी ऐकून सुखद धक्का बसला. परंतु पाकिटातील कागदपत्रांवर कुठेही मोबाईल नंबर नसताना गुप्ता यांनी तो कसा मिळविलाल हा प्रश्न ताडे यांना पडला होता. याबाबत विचारणा केल्यानंतर गुप्ता यांनी संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा केला. गुप्ता यांना पाकीट सापडल्यानंतर त्यांनी पाकिटातील एटीएम कार्डवरील नावाच्या आधारे प्रमोद ताडे यांचे फेसबुकवरील प्रोफाईल शोधले. त्यावरुन त्यांना त्यांची प्राथमिक माहिती मिळाली. परंतु प्रोफाईलवर ताडे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक नसल्याने त्यांनी त्यांची ‘फ्रेंडलिस्ट’ शोधली. त्यामधून अकोला येथील संतोष टाले या ताडे यांच्या मित्राचा मोबाईल नंबर त्यांना गवसला. या क्रमांकावर संपर्क करून त्यांनी ताडेंंचा क्रमांक मिळविला व पाकीट सुरक्षित असल्याचे सांगितले. ताडेंनी गुप्ता यांच्याकडे जाऊन पाकीट परत मिळविले. साधारण आर्थिक स्थिती असूनही दिलेले बक्षीस गुप्ता यांनी नाकारून प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण असल्याचे सिध्द केले.