शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

नियतीवर करायला मात त्याने पायांनाच बनवले हात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 22:59 IST

वयाच्या सातव्या वर्षी नियतीने घात केला. दोन्ही हात विजेच्या ताराच्या स्पर्शाने निकामी झाले.

ठळक मुद्देरक्षाबंधन विशेष : तन्मय-वंशिकाची कहाणी

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : वयाच्या सातव्या वर्षी नियतीने घात केला. दोन्ही हात विजेच्या ताराच्या स्पर्शाने निकामी झाले. तेव्हापासून संघर्षमय जीवनात त्याने पायांनाच हात बनवीत नियतीवर मात केली आहे.या लढाईत बहिणीची मिळालेली साथ कथन करताना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला त्याने आपल्या डोळ्यातील अश्रूधारेला वाट मोकळी करून दिली़भावाबहिणीच्या अतूट स्रेहाचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण मागील पाच वर्षांपासून विनाहाताने; पण आत्मविश्वास व सकारात्मक इच्छाशक्तीने १२ वर्षीय तन्मय मढावी हा साजरा करीत आहे़ तन्मयची कहाणी काळजाला भेदून जाणारी ठरली आहे. तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचे गाव असलेले हिरपूर येथील हातावर आणून पानावर खाणाºया आदिवासी कुटुंबातील रणजित मढावी यांचा मुलगा तन्मय हा पाच वर्षांपूर्वी गावात ईरा भवनजवळ मित्रासोबत खेळत असताना अचानक विजेची तार त्याच्या डोक्यावर पडली. यात तो डोक्यापासून पायापर्यंत भाजला गेला तन्मयला प्रथम यवतमाळ, व तेथून नागपूर येथे दाखल करण्यात आले. खांद्यापासून हात कापण्याचा सल्ला नागपूरच्या डॉक्टरांनी दिला़ यावेळी गरीब असूनही साडेतीन लाखांचे कर्ज काढून जन्मदात्यांनी तन्मयला मुंबईला हलविले. तब्बल तिथे दीड महिना दवाखान्यात ठेवून मृत्यूच्या दाडेतून जन्मदात्यांनी तन्मयला जीवदान दिले. मात्र या संघर्षात त्याला दोन्ही हात गमवावे लागले.भावाच्या संघर्षाला बहिणीची साथबहिणभावाच्या अतूट उत्कंठ प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन या दिवशी राखी बांधावी भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे या मागची मंगल मनोकामना असली तरी आपल्या भावाचे रक्षण व त्याच्या क्षणाक्षणाला लागणाºया बाबीसाठी तन्मयची लहान तिसºया वर्गात शिकणारी बहिण धावपळ करते़ तन्मयला हात नसल्यामुळे केशरचना करणे, स्रान करणे, शौच धुऊन देणे, असा दैनंदिन उपक्रम वंशिका करून देत आहे़ नियतीने माझ्या भावाला दिव्यांग आणले पण मी पूर्णपणे त्याचा सांभाळ करू शकते, असा आत्मविश्वास ती व्यक्त करते़ तन्मयची कहाणी ऐकताना पापण्यांच्या कडा कधी ओलावतात ते समजत नाही़ दोन्ही हाताशिवाय जीवन जगणाºया तन्मयचे भविष्य काय, या विचाराने प्रथम मढावी कुटुंब हळहळले. पण आपल्या सदगदीत भावनांना मुरड घालून त्यांनी तन्मयचे संगोपन काळजीपूर्वक केले. त्याच्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून जन्मदाते आजही काळजी घेतात़ तन्मयने हातासाठी आसव गाळत बसण्यापेक्षा पायांनी व ढोपरपर्यंत असलेल्या भागांनी आयुष्य जगण्याला सुरूवात केली़ गावातच जि़ल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सातवीत तो शिक्षण घेत आहे़ पायांना हात बनवित पेन्सील धरून अक्षर गिरवीत आहे़ क्रिकेटसह इतर खेळात तो तरबेज आहे़ आयुष्याला ओंजळीत नियतीने अपंगत्व टाकले. डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी हात नसले तरी स्वत:च्या पायावर उभे राहून भविष्यात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न तन्मय पाहतो आहे़