शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कॉम्प्युटर आॅपरेटर्समध्ये निम्मी कपात

By admin | Updated: February 4, 2017 00:10 IST

महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या वाजवीपेक्षा अधिक कंत्राटी कॉम्प्युटर आॅपरेटर्सची कपात करण्यात येणार आहे.

आस्थापना खर्चात बचतीची भूमिका : संगणक कर्मचाऱ्यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्हअमरावती : महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या वाजवीपेक्षा अधिक कंत्राटी कॉम्प्युटर आॅपरेटर्सची कपात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७० पैकी ३५ जणांना कामावरून कमी करण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित आॅपरेटर्सची छाननी केली जाईल. अनावश्यक ठिकाणचे कंत्राटी कर्मचारी कमी करण्यासोबतच आस्थापना खर्चात बचत करण्याची भूमिका ठेवून आयुक्तांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कपातीचे पाऊल उचलले आहे. तत्कालीन आयुक्तांच्या कार्यालयात एका खासगी कंत्राटी एजन्सीकडून महापालिकेने कॉम्प्युटर आॅपरेटर्सची सेवा घेतली आहे. मूळ करारनामा अल्पसंख्येचा असताना त्या संस्थेत वेळोवेळी भर घालण्यात आली. तूर्तास महापालिकेच्या विविध विभागांत ७० कॉम्प्युटर आॅपरेटर्स आहेत. दादा आणि भाऊंच्या दबावापोटी विनाकारण ही संख्या फुगविली गेली. वास्तविक पाहता इतक्या मोठ्या संख्येत कॉम्प्युटर आॅपरेटर कार्यरत असतील तर संबंधित विभागातील कनिष्ठ किंवा वरिष्ठ लिपिकांना संगणकाचे ज्ञान नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. कर्मचाऱ्यांच्या संगणकीय ज्ञानाचा भाग वगळला तरीही कंत्राटी तत्त्वावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची काही ठिकाणे सेवा आवश्यक नसतानाही ते कार्यरत आहेत. तसे निरीक्षण दस्तुरखुद्द आयुक्तांनी नोंदविले आहे. अनावश्यक ठिकाणी कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्याने मनपाच्या आस्थापनाखर्चात अवाजवी वाढ होत आहे. त्याअनुषंगाने सर्व घटकप्रमुखांनी त्यांच्या विभागात कार्यरत असलेल्या कॉम्प्युटर आॅपरेटर, सुरक्षारक्षक व अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामाचा आढावा घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर सर्वात पहिली कारवाई कॉम्प्युटर आॅपरेटर्सवर होणार आहे. त्यांची संख्या निम्म्याने कपात करण्यात येईल. तसे निर्देश उपायुक्त विनायक औगड यांना देण्यात आले आहेत. कंत्राटीबाबत आज बैठकसुरक्षारक्षक, कॉम्प्युटर आॅपरेटर्स व अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची आवश्यकता याबाबतच आढावा शनिवारी आयुक्तांकडून घेतला जाणार आहे. ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता प्रपत्रातील माहितीसह बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.अन्यथा विभागप्रमुखांच्या वेतनातून कपात४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता प्रभागातील माहिती व तपशिलासह उपस्थित राहावे, जेणेकरून अनावश्यक कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणता येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त यापुढे एखाद्या विभागात अनावश्यक कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्यास तो जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर निश्चित करण्यात येईल व अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन संबंधित विभागप्रमुखांच्या वेतनातून वसूल करण्यात येणार आहे.