शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

साडेअकरा कोटींचा निधी परत

By admin | Updated: July 7, 2016 00:06 IST

जिल्हा परिषदेला जलयुक्त शिवारसाठी दिलेला सन २०१५-१६ मधील १५ कोटी ८८ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यावरही यापैकी केवळ ४ कोटी २१ लाख रूपयेच

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : वर्षभरापासून जलशिवारचा निधी होता अखर्चितजितेंद्र दखने अमरावतीजिल्हा परिषदेला जलयुक्त शिवारसाठी दिलेला सन २०१५-१६ मधील १५ कोटी ८८ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यावरही यापैकी केवळ ४ कोटी २१ लाख रूपयेच जिल्हा परिषद सिंचन विभागाने खर्च केल्यामुळे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सुमारे ११ कोटी ६९ लाख रूपये हे कृषी, जलसंपदा व अन्य विभागाकडे वळते केले आहेत. निधी खर्च करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी शासन आदेशानुसार ३० जूनची मुदत देऊन सिंचन विभागात जलयुक्त शिवारचा निधी खर्च करणयत अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट होते. २७ मे रोजी जिल्हाधिकारी गित्ते यांनी जिल्हा परिषदेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांची जलयुक्त शिवार अभियानाच्या मुद्यावर आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेला मागील वर्षी १५६ कामासाठी २७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र या निधीतून एकही काम केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत जिल्हा परिषद सिंचन विभागाला जलयुक्त शिवारची कामे करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता. मात्र या कालावधीत जिल्हा परिषद सिंचन विभाग केवळ ४ कोटी २१ लख रूपयेच खर्च करू शकला. परिणामी १५ कोटी ८८ लाख रूपयांच्या रक्कमेपैकी अखर्चित असलेली ११ कोटी ६९ लाख रूपयांची रक्कम २२ जून रोजी जिल्हाधिकारी यांनी परत मागवून ही रक्कम ज्या यंत्रणांनी विहित कालावधीत कामे करूं अतिरिक्त कामासाठी मागितली होती त्या विभागाना ही रक्कम मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी अभियानात जिल्हा प्रशासनाने जवळपास २०६ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. १५ कोटी रूपयांवर निधी उपलब्ध आॅक्टोबर २०१५ मध्ये दिला होता. यामधून २२६ कामे प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. यापैकी सिंचन विभागाने केवळ ६८ कामे पुर्ण केली आहेत.यापोटी ४ कोटी २१ लाख रूपये खर्च केले आहेत. तर ११ कोटी ६९ लाखांचा निधी हा खर्च करण्यास सिंचन विभाग अकार्यक्षम ठरला. त्यामुळे नाईलाजास्तव जिल्ह्यातील, सिंचनाचे दृष्टीने महत्त्वाच्या कामाचा हा निधी जिल्हाधिकारी यांनी परत मागवून तो जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या यंत्रणांनी कामासाठी मागितला होता. त्यानुसार कृषी, जलसंपदा, भुजल सर्वेक्षण यंत्रणा आदी विभागांना हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विभागानी जलयुक्त शिवारमधून कामे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे निधीच्या मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे निधी अखर्चित असल्याने हा निधी उपलब्ध करून दिला आहे.