शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

निम्म्या बसेस रस्त्यावर; त्यांनाही प्रवासी मिळेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:01 IST

अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आठ आगारांतील  कर्मचारी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, याकरिता संपावर आहेत. त्यानंतर एसटी बस रस्त्यावर दिसली नाही. आता काही कर्मचारी  कामावर परत आले असल्याने  एसटीच्या फेऱ्यांची संख्या वाढत असून,  आज  ५२ बसेसव्दारे १४६ फेऱ्या सुरू आहेत.

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या तीन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. जिल्ह्यातील १,४४४ फेऱ्यांपैकी १४६ फेऱ्या सुरू असून  बसेस निम्म्याहून अधिक रिकाम्याच धावत आहेत. त्यामुळे एसटीचे प्रवासी गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आठ आगारांतील  कर्मचारी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, याकरिता संपावर आहेत. त्यानंतर एसटी बस रस्त्यावर दिसली नाही. आता काही कर्मचारी  कामावर परत आले असल्याने  एसटीच्या फेऱ्यांची संख्या वाढत असून,  आज  ५२ बसेसव्दारे १४६ फेऱ्या सुरू आहेत. मात्र, एसटीला  प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दिसून येत आहे.  

४,००,००,००० रुपयांचा फटका बसला चार महिन्यात राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाला आतापर्यंत जवळपास  चार कोटींचा फटका बसला आहे. तर गेल्या चार महिन्यांत ५३ बसव्दारे १५३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ कोटी ८० लाख रूपयांचे उत्पन्न अमरावती विभागाला मिळाले आहे. 

आगारप्रमुख काय म्हणतात?एसटीचा संप सुरू झाल्यानंतर काही दिवस बसेस बंद होत्या. अशातच आता बसेस सुरू झाल्या आहेत. अनेक मार्गांवर बसेस धावू लागल्या आहेत. त्यांना प्रवाशांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे.- संदीप खवले, आगारप्रमुख, अमरावती

आठही आगारांत ५० पेक्षा जास्त बसेस धावतात. एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी ५० खासगी चालक करारावर घेतले आहेत,वाहकांची जबाबदारी ही एका खासगी कंपनीला दिली. त्यामुळे बसेस पूर्ण सुरू होतील.- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक

ग्रामीण भागात बसेस कधी जाणार?जिल्ह्यात एसटीला ग्रामीण प्रवाशांचा मोठा आधार असतो. परंतु, एसटीचा संप सुरू झाल्यापासून गत तीन महिन्यांत ग्रामीण भागात एकही बस गेलेली नाही. ग्रामीण भागातील प्रवासी शहरात खासगी वाहनांनी येतात. त्याचाही एसटीवर परिणाम झाला आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप