शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या बसेस रस्त्यावर; त्यांनाही प्रवासी मिळेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:01 IST

अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आठ आगारांतील  कर्मचारी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, याकरिता संपावर आहेत. त्यानंतर एसटी बस रस्त्यावर दिसली नाही. आता काही कर्मचारी  कामावर परत आले असल्याने  एसटीच्या फेऱ्यांची संख्या वाढत असून,  आज  ५२ बसेसव्दारे १४६ फेऱ्या सुरू आहेत.

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या तीन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. जिल्ह्यातील १,४४४ फेऱ्यांपैकी १४६ फेऱ्या सुरू असून  बसेस निम्म्याहून अधिक रिकाम्याच धावत आहेत. त्यामुळे एसटीचे प्रवासी गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आठ आगारांतील  कर्मचारी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, याकरिता संपावर आहेत. त्यानंतर एसटी बस रस्त्यावर दिसली नाही. आता काही कर्मचारी  कामावर परत आले असल्याने  एसटीच्या फेऱ्यांची संख्या वाढत असून,  आज  ५२ बसेसव्दारे १४६ फेऱ्या सुरू आहेत. मात्र, एसटीला  प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दिसून येत आहे.  

४,००,००,००० रुपयांचा फटका बसला चार महिन्यात राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाला आतापर्यंत जवळपास  चार कोटींचा फटका बसला आहे. तर गेल्या चार महिन्यांत ५३ बसव्दारे १५३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ कोटी ८० लाख रूपयांचे उत्पन्न अमरावती विभागाला मिळाले आहे. 

आगारप्रमुख काय म्हणतात?एसटीचा संप सुरू झाल्यानंतर काही दिवस बसेस बंद होत्या. अशातच आता बसेस सुरू झाल्या आहेत. अनेक मार्गांवर बसेस धावू लागल्या आहेत. त्यांना प्रवाशांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे.- संदीप खवले, आगारप्रमुख, अमरावती

आठही आगारांत ५० पेक्षा जास्त बसेस धावतात. एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी ५० खासगी चालक करारावर घेतले आहेत,वाहकांची जबाबदारी ही एका खासगी कंपनीला दिली. त्यामुळे बसेस पूर्ण सुरू होतील.- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक

ग्रामीण भागात बसेस कधी जाणार?जिल्ह्यात एसटीला ग्रामीण प्रवाशांचा मोठा आधार असतो. परंतु, एसटीचा संप सुरू झाल्यापासून गत तीन महिन्यांत ग्रामीण भागात एकही बस गेलेली नाही. ग्रामीण भागातील प्रवासी शहरात खासगी वाहनांनी येतात. त्याचाही एसटीवर परिणाम झाला आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप