शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वरूड तालुक्यात गारपीट; अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:34 IST

तालुक्याला शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाचा फटका बसला. सुमारे २० मिनिटे बोराएवढी गारपीट झाल्याने संत्रा, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील कारली, वाई, पेंढोणी, जामगाव, महेंद्री, करवार, पंढरी, पुसला परिसरात अवकाळी पावसासह ही गारपीट झाली.

ठळक मुद्देगहू, संत्र्याचे नुकसान : मृग बहराच्या फळांना डच्चू लागण्याची भीती; भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्याला शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाचा फटका बसला. सुमारे २० मिनिटे बोराएवढी गारपीट झाल्याने संत्रा, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील कारली, वाई, पेंढोणी, जामगाव, महेंद्री, करवार, पंढरी, पुसला परिसरात अवकाळी पावसासह ही गारपीट झाली.पुसला, शेंदूरजनाघाट परिसरात १५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानकच ढग दाटले. अवकाळी पावसासह गारपीट सुरू झाली. तब्बल २० मिनिटे गार कोसळली. यामुळे संत्र्यावर फुललेला आंबिया बहर जमिनीवर येऊन मातीमोल झाला. गहू व हरभरा पिकालासुद्धा फटका बसला. तालुक्यात काही ठिकाणी मृग बहराच्या संत्र्याची तोड सुरू आहे. त्या संत्र्यावरसुद्धा गारपिटीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. गारपिटीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.भाजपचे माजी उपाध्यक्ष विजय श्रीराव यांनी तातडीने पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून भरपाईची मागणी प्रशासनाला केली आहे. महिनाभरापूर्वी तालुक्यात झालेल्या गारपिटीने संत्रा व गव्हाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानाचे सर्वेक्षण अद्यापही झालेले नसताना, शुक्रवारी पुन्हा एकदा निसर्ग कोपला अन् हाता-तोंडाशी आलेला संत्र्यांचा आंबिया बहर मातीमोल झाल्याने बागायतदार हवालदिल झाला आहे. तालुक्यात अन्य ठिकाणी गारपीट होण्याची धास्ती शेतकºयांना आहे.