शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा हाहाकार; भिंत कोसळून दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

आर्वी तालुक्यातील घटना : आर्वी-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प फोटो : ०९डब्ल्यूएचपीएच०१, ०२, ०३, ०४ वर्धा : सततच्या पावसामुळे झोपेत ...

आर्वी तालुक्यातील घटना : आर्वी-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प

फोटो : ०९डब्ल्यूएचपीएच०१, ०२, ०३, ०४

वर्धा : सततच्या पावसामुळे झोपेत असलेल्या पती-पत्नीच्या अंगाव घराची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आर्वी तालुक्यातील दहेगाव (गोंडी) येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने गावात स्मशानशांतता पसरली होती. भिंतीच्या मातीत दबलेले दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. त्यांच्या परिवारातील काही सदस्य जखमी झाले आहेत.

रामकृष्ण महादेव चौधरी (४५) व ज्योती रामकृष्ण चौधरी (४०, रा. दहेगाव (गोंडी) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा आदित्य रामकृष्ण चौधरी (१५) हा जखमी झाला आहे. जिल्हा प्रशासनाने घटनेची नोंद घेतली असून, कार्यवाही सुरू आहे. तीन ते चार दिवसांपासून सुुरू असलेल्या पावसामुळे वर्धा-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील उर्ध्व वर्धा (सिंभोरा) प्रकल्पात ९८.३६ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या १३ गेटपैकी १२ गेट ४५ से.मी.ने उघडण्यात आले असून, ५६३ घ.मी.प्र.से. पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले. या नदीवरील आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने या प्रकल्पाचेही सर्व ३१ गेट उघडण्यात आल्याने ३०३५.२४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले तर घरांचीही पडझड झाली आहे. वर्धा नदी ओसंडून वाहत असल्याने आर्वी-अमरावती मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे.