शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पावसाचा हाहाकार; भिंत कोसळून दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

आर्वी तालुक्यातील घटना : आर्वी-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प फोटो : ०९डब्ल्यूएचपीएच०१, ०२, ०३, ०४ वर्धा : सततच्या पावसामुळे झोपेत ...

आर्वी तालुक्यातील घटना : आर्वी-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प

फोटो : ०९डब्ल्यूएचपीएच०१, ०२, ०३, ०४

वर्धा : सततच्या पावसामुळे झोपेत असलेल्या पती-पत्नीच्या अंगाव घराची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आर्वी तालुक्यातील दहेगाव (गोंडी) येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने गावात स्मशानशांतता पसरली होती. भिंतीच्या मातीत दबलेले दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. त्यांच्या परिवारातील काही सदस्य जखमी झाले आहेत.

रामकृष्ण महादेव चौधरी (४५) व ज्योती रामकृष्ण चौधरी (४०, रा. दहेगाव (गोंडी) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा आदित्य रामकृष्ण चौधरी (१५) हा जखमी झाला आहे. जिल्हा प्रशासनाने घटनेची नोंद घेतली असून, कार्यवाही सुरू आहे. तीन ते चार दिवसांपासून सुुरू असलेल्या पावसामुळे वर्धा-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील उर्ध्व वर्धा (सिंभोरा) प्रकल्पात ९८.३६ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या १३ गेटपैकी १२ गेट ४५ से.मी.ने उघडण्यात आले असून, ५६३ घ.मी.प्र.से. पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले. या नदीवरील आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने या प्रकल्पाचेही सर्व ३१ गेट उघडण्यात आल्याने ३०३५.२४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले तर घरांचीही पडझड झाली आहे. वर्धा नदी ओसंडून वाहत असल्याने आर्वी-अमरावती मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे.